शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार घोलप यांची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 11:48 IST

देवळाली मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर गेल्या ३० वर्षांपासून माजी मंत्री बबनराव घोलप यांची एकहाती सत्ता आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही भाजप आणि शिवसनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र असे असली तरीही युतीच्या जागावाटपाचा पेच कायम आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघ युतीत शिवसेनेला सुटला असतानाही भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र विद्यमान आमदार असलेल्या युतीच्या जागेत कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने सेनेचे विद्यमान आमदार योगेश घोलप यांची चिंता मिटली आहे.

देवळाली मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर गेल्या ३० वर्षांपासून माजी मंत्री बबनराव घोलप यांची एकहाती सत्ता आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात घोलपांना शिक्षा झाली. त्यामुळे सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर त्यांच्यावर बंदी आली. त्यामुळे त्यांनी आपले पुत्र योगेश घोलप यांना रिंगणात उतरवले आणि विजयश्रीही खेचून आणला. कधीकाळी राष्ट्रवादीत असलेल्या रामदास सदाफुले यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत योगेश घोलप यांना आव्हान दिले. मात्र वडिलांप्रमाणे योगेश यांनी सुद्धा विजयाची मालिका कायम ठेवली.

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये असलेले सदाफुले पुन्हा इच्छुक आहेत . मागच्यावेळी युती नसल्याने सदाफुले यांना भाजपकडून लढता आले. यावेळी मात्र युती होणार असल्याचे जवळपास निश्चीत झाल्याने, सदाफुले यांना युतीच्या जागावाटपावेळी फेरबदल होण्याची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. मात्र विद्यमान आमदार असलेल्या युतीच्या जागेत कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने सदाफुले यांची निराशा झाली आहेत तर विद्यमान आमदार असलेले योगेश घोलप यांची चिंता मिटली आहे.

मतदारसंघाचा आढावा

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या देवळाली मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दोन्ही समाजातील मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरतात. तर लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवार यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याकडे इच्छुक उमेदवारांना कानाडोळा करता येणार नाही. युतीत शिवसनेचे घोलप यांची उमदेवारी निश्चित मानली जात आहे. तर सदाफुले हे ऐनवेळी काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहेत. त्यातच विद्यमान तहसीलदार राजश्री अहिरराव यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे युतीचा अंतिम उमदेवारी निश्चीत होईपर्यंत या मतदारसंघात इच्छुकांची चर्चा सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे.