शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेंडालमधून गुरुजींची कार निघाली, लोक दर्शनासाठी धावले अन्..."; नेमकं काय घडलं? पीडित प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
2
विरोधी पक्षांचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते; PM मोदींनी दिला पाण्याचा ग्लास, बघा VIDEO
3
हाथरस दुर्घटना : मृतदेह बघून हृदयविकाराचा झटका, कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू
4
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले; CM शिंदेंनी बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय
5
"देशाने 1 जुलैला 'खटाखट दिवस' साजरा केला, लोक बँक खाते चेक करत होते...", PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार निशाणा
6
IB मध्ये नोकरी, आता धार्मिक सत्संग; कोण आहेत भोले बाबा? ज्यांच्या कार्यक्रमात झाली चेंगराचेंगरी
7
पिंपरी जलसेनची जिल्हा परिषद शाळा खासगी शाळेवर भारी, २२ गावांतून येतात विद्यार्थी
8
चक्रीवादळात अडकलेल्या टीम इंडियाचा मार्ग मोकळा; या तारखेला मायदेशी परतणार सर्व खेळाडू
9
"ही आता परजीवी काँग्रेस; ज्याच्यासोबत असते त्यालाच...", पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
10
“ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
11
Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
12
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
13
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
14
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
15
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
17
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
18
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
19
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
20
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी

मुलींचीच सरशी!

By admin | Published: June 07, 2016 7:43 AM

राज्याचा दहावीचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने जाहीर झाला असून, यंदा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के लागला

पुणे : राज्याचा दहावीचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने जाहीर झाला असून, यंदा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या निकालातही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी ३.४३ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.९० टक्क्यांनी निकालात घट झाली आहे. विभागीय मंडळात कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.५६ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ८१.५४ टक्के आहे. ३ हजार ९७४ शाळांचा निकाल १०० टक्के तर ६१ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत १ ते २९ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आली. १६ लाख ७ हजार ४११ विद्यार्थ्यांपैकी १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मार्च २०१६च्या दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा येत्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे निकालात १.९० टक्क्यांनी घट झाली, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)>९१ विद्यार्थी काठावर पासउत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी राज्यभरातील ९१ विद्यार्थी काठावर पास झाले असून, त्यांना सर्व विषयांमध्ये १००पैकी प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. >सिंधुदुर्ग अव्वल तर नांदेड सर्वांत खालीमागील वर्षी दहावी-बारावीच्या निकालाचे सर्व विक्रम मोडीत निघाले होते. मात्र, यंदा निकालात घट झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वांत जास्त ९७.४७ टक्के लागला असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल सर्वांत कमी ७४.४८ टक्के आहे. विद्यार्थिनींचा एकूण निकाल ९१.४१ टक्के असून, विद्यार्थ्यांचा निकाल ८७.९८ टक्के लागला आहे. राज्यातील अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८८.७३ टक्के लागला आहे. मंडळातर्फे ५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली; त्यात १० विषयांचा निकाल १०० टक्के आहे.राज्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ४ हजार ७९४ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत तर ५ लाख ६१ हजार ७८६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७४ हजार ५१८ आहे. परीक्षेतील गैरप्रकारासह विविध कारणांमुळे राज्यातील ४२७ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. मुंबईच्या निकालात एक टक्क्याने घटदहावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरला आहे. गेल्या वर्षी ९२.९० टक्के निकालावर झेपावलेल्या मुंबई विभागाला यंदा ९१.९० टक्के निकालावर समाधान मानावे लागले. मात्र राज्यातील नऊ विभागीय मंडळांतील चौथे स्थान मुंबईने कायम राखले आहे. ९१.९० टक्के निकालात मुलींचे प्रमाण ९३.०७ टक्के असून, मुलांचे प्रमाण ९०.८३ टक्के एवढे आहे.