शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:08 AM

वाशिम जिल्ह्यातील घटना : दहावीत मिळाले होते ७२ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : वडील आॅटो चालवितात; तर आई मिळेल ते मोलमजुरीचे काम करते. या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर चार मुली आणि एका मुलाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार तरी कसा ? दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण पूर्ण झाले; परंतु पुढच्या शिक्षणासाठी पैसे कसे मिळणार? लग्नासाठीदेखील पैसे लागणारच, आदी प्रश्नांनी घेरल्या गेलेल्या पोहा येथील पल्लवी गोकुल तायडे (वय १६ वर्षे) या मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना सोमवार, १७ जुलै रोजी उघडकीस आली. मृतक पल्लवी तायडे ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिच्या कुटुंबात आई-वडिल, तीन बहिणी आणि एक भाऊ असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च, लहान-सहान आजार यासह भविष्यात लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करीत असताना आई आणि वडील दोघांचीही दमछाक होत होती. अशा विदारक परिस्थितीत लहानाची मोठी झालेल्या पल्लवीने वसंत विद्यालय, पोहा येथे शिकत असताना कठीण परिश्रमातून दहावीच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळविले होते. मात्र, पुढचे शिक्षण घ्यायचे म्हटले तर गाव सोडून शहरात जावे लागणार होते. दरम्यान, कमीत कमी खर्चात कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, याची चाचपणी करीत असताना पल्लवीने तीन ते चार महाविद्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र, ११ वी नंतरचे शिक्षण कमी पैशात कदापि शक्य नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर तिने हलाखीच्या आर्थिक परिस्थितीसमोर गुडघे टेकत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली,असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पोहा गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. ‘त्या’ मातेचा आक्रोश असह्य करणारा!चार मुली आणि एका मुलगा यामध्ये सर्वात मोठी असलेल्या पल्लवीने १७ जुलै रोजी घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात घेताच तिच्या आईने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावून तिचा गळफास सोडवून घेतला. तिला उपचाराकरिता कारंजाच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १७ जुलैच्या मध्यरात्री उपचारादरम्यान पल्लवीची प्राणज्योत मालवली. मुलीच्या अशाप्रकारच्या मृत्यूमुळे तिच्या आईने केलेला आक्रोश असह्य करणारा होता.