शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

परिवर्तनासाठी भाजपाला बहुमत द्या!

By admin | Published: October 14, 2014 1:27 AM

महाराष्ट्रात परिवर्तन घडण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासयोजनांचा लाभ होण्यासाठी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत द्या,

उमरखेड (जि. यतवतमाळ) : काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत राज्यात कोणाच्याही आयुष्यात परिवर्तन घडले नाही. महाराष्ट्रात परिवर्तन घडण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासयोजनांचा लाभ होण्यासाठी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड विधानसभा मतदारसंघात महागाव येथे भाजपा उमेदवार राजेंद्र वामन नजरधने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांच्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत महाराष्ट्राला केवळ शेतक:यांच्या आत्महत्या आणि महिलांवर बलात्कार यामध्ये आघाडी मिळाली. 
आघाडी सरकारच्या राजवटीत दीन दलित, आदिवासी, महिला, विद्यार्थी, शेतकरी अशा कोणाच्याही आयुष्यात परिवर्तन घडले नाही. महाराष्ट्रात परिवर्तन होण्यासाठी पंधरा ऑक्टोबरला कमळाचे बटण दाबा आणि भाजपाला स्पष्ट बहुमत द्या.
त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमताने नरेंद्र मोदी यांचे सरकार निवडून दिले. देशात स्पष्ट बहुमत असलेले कणखर सरकार असल्यावर कसे परिवर्तन होते हे आपण अनुभवतो आहोत. देशात पेट्रोल – डिङोलच्या किंमती कमी झाल्या. देशात गुंतवणूक वाढली, अर्थव्यवस्थेला गती येऊ लागली व त्याबरोबर रोजगारिनर्मिती होण्यास सुरु वात झाली. 
नरेंद्र मोदी यांनी जपान, अमेरिका आदी देशांना भेट दिली. त्याची दखल जगाने घेतली. हा करिष्मा स्पष्ट बहुमत असलेल्या कणखर सरकारचा आहे. राज्यातही परिवर्तन होण्यासाठी संपूर्ण बहुमत असलेले व नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून काम करणारे सरकार हवे आहे. 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गांधी जयंतीला नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताची घोषणा दिली. त्यानुसार आपण आपले घर, कार्यालय आण िपरिसर स्वच्छ करण्यास मैदानात उतरलो. देश स्वच्छ करायचा असेल तर महाराष्ट्र स्वच्छ करायला हवा.