शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

काँग्रेसला एकहाती सत्ता द्या

By admin | Published: October 13, 2014 10:33 PM

पृथ्वीराज चव्हाण : रामानंदनगर येथे पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ सभा

किर्लोस्करवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहंकारामुळे आघाडी फुटली. मात्र आघाडीमुळे राज्याचे नुकसान होत असल्याने काँग्रेस पक्षालाचा एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ रामानंदनगर (ता. पलूस) येथील सभेत ते बोलत होते.चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी झाली. राष्ट्रवादीशी आघाडी करू नये असाच सर्वत्र सूर होता. मात्र जनतेमध्ये वेगळा संदेश जाऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र भाजपने शिवसेनेशी युती तोडल्याची घोषणा करताना राष्ट्रवादीमध्येही अहंकार निर्माण झाला. सरकारचा पाठिंबा काढून राष्ट्रवादीने एकप्रकारे १५ दिवसांकरिता केंद्रातील भाजपच्याच हातात राज्याची सत्ता दिली आहे.ते म्हणाले की, विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील सर्व प्रश्न सोडवून महाराष्ट्राशी एकी राखली. मात्र स्वतंत्र विदर्भ, केंद्रशासित प्रदेश म्हणून मुंबई, असा कुटिल डाव केंद्रातील भाजप सरकारचा आहे. महाराष्ट्राची फाळणी करण्याचा भाजपचा हा कुटिल डाव त्यांचा पराभव करून जनता उधळून लावेल.पतंगराव कदम म्हणाले की, राष्ट्रवादीतील सर्व भ्रष्ट उमेदवार भाजपला मिळाले आहेत. मात्र जिल्ह्यात आठ पैकी पाच आमदार काँग्रेसचे असतील. गेल्या निवडणुकीपेक्षा आपला यावेळेला दुप्पट मताधिक्याने विजय निश्चित आहे. यावेळी मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, सभापती यास्मिन पिरजादे, माजी सरपंच जयसिंगराव नावडकर यांची भाषणे झाली. सभेस मोहनराव कदम, महेंद्र लाड, गणपतराव सावंत-पाटील, सर्जेराव पवार, सरपंच वार्इंगडे, माजी सरपंच प्रल्हाद सिताफे, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, अकबर नदाफ, श्रीकांत लाड, उपसरपंच कोल्हापुरे, डॉ. डी. डी. माने, प्रशांत नलावडे, अख्तर पिरजादे, मीनाक्षी सावंत, श्वेता बिरनाळे, ऋषिकेश लाड, सुधीर जाधव उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच जयसिंगराव नावडकर यांचा सत्कार डॉ. कदम यांच्याहस्ते झाला. (वार्ताहर)