शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

अनुभवांना चेहरा देणे म्हणजे कविता

By admin | Published: December 31, 2015 4:14 AM

गेली सात दशके आपल्या शब्दांद्वारे मराठी कवितेला स्वत:ची वेगळी ओळख देणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी कवितेबरोबर जीवनातील विविध विषयांवर चिंतन केले.

गेली सात दशके आपल्या शब्दांद्वारे मराठी कवितेला स्वत:ची वेगळी ओळख देणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी कवितेबरोबर जीवनातील विविध विषयांवर चिंतन केले. कविता अनुभवच असतात. प्रत्येक अनुभव कवीकडे चेहरा मागत असतो. त्याचा आविष्कार कविता, गझल किंवा गाण्याच्या रूपात होत असतो. या शब्दात ९ वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या नागपूर संगीत महोत्सव निमित्ताने पाडगावकर यांनी ‘लोकमत’चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांच्याकडे आपल्या लेखनाचा प्रवास उलगडला होता.कविता किंवा गाणं कसं सूचतं, ते अजिबात सांगता येणार नाही. एखादी घटना घडते किंवा विशिष्ट असा उत्कट अनुभव येतो, तेव्हा कविता मुळीच सूचत नाही. उलट काहीही संबंध नसताना एक ओळ मनात येते आणि तीच कवितेची सुरुवात ठरते. माझं ‘श्रावणात घननिळा’ हे गाणं असंच अचानक निर्माण झालं आहे. त्यामागची पार्श्वभूमी गमतीशीर आहे. मुंबईत मी एकदा रेल्वेने प्रवास करत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. घाम गळत होता. तितक्यात अचानक एक ओळ कुठून तरी आली. अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही तिचा मला मूड कळला. त्यावेळी प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या श्रीनिवास खळे आणि मी, त्या गाण्याचा मूड व्ही.टी. स्टेशन येईपर्यंत पकडला होता. गंमत अशी, की, ‘श्रावणात घननिळा’ हे गाणे जरी पावसात भिजलेले वाटत असले, तरी ते ऐन घामेजलेल्या दिवसांत तयार झालेले आहे.‘कविता एकट्याने वाचता येते, परंतु गाणं एकट्याने वाचता येत नाही. कविता आणि गाणं यांची तुलनाही करता येत नाही. जीवनातल्या नाना तऱ्हेचे अनुभव माझ्याकडे येतात. ते मला सांगतात की, मला माझा चेहरा दे, मला माझा आवाज दे. प्रत्येक अनुभव त्याची भाषा मागत असतो. असाच कधीतरी एक अनुभव मला येऊन सांगतो की, मला चेहरा दे मला गझल व्हायचंय. तेव्हा तो शुद्ध गझलच असतो. या तिन्ही प्रकारांत भाषेची सर्जनशीलता महत्त्वाची असते’.सन्मान कविवर्यांचा...नागपूर संगीत महोत्सव, तसेच मराठी हास्यकवी संमेलन अशा ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मंगेश पाडगावकर आवर्जून उपस्थित होते.आम्ही मुंबईच्या रस्त्यावर कविता वाचल्या आहेत‘यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या संगीतकारांनी माझ्या बहुतांश गाण्यांना चाली लावल्या आहेत. चालीवरून गाण्यांचे शब्द लिहिणे मला मान्य नाही.मी तसं करू शकतो, पण तसे करणे मला पटत नाही. एखाद्या काव्याचं गाणं करायचं की कविता, हे माझ्यातला कलाकार ठरवतो’. मी विंदा आणि वसंत बापट असे आम्ही तिघांनी गावोगाव फिरून कार्यक्रम केले. टीका करणाऱ्यांनी त्यावर टीका केली, पण आम्ही आमचे कार्यक्रम सुरूच ठेवले.आम्ही मुंबईच्या रस्त्यावर कविता वाचल्या आहेत‘यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या संगीतकारांनी माझ्या बहुतांश गाण्यांना चाली लावल्या आहेत. चालीवरून गाण्यांचे शब्द लिहिणे मला मान्य नाही.मी तसं करू शकतो, पण तसे करणे मला पटत नाही. एखाद्या काव्याचं गाणं करायचं की कविता, हे माझ्यातला कलाकार ठरवतो’. मी विंदा आणि वसंत बापट असे आम्ही तिघांनी गावोगाव फिरून कार्यक्रम केले. टीका करणाऱ्यांनी त्यावर टीका केली, पण आम्ही आमचे कार्यक्रम सुरूच ठेवले.