शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

तळीरामांना द्या चालक आणि टॅक्सी सेवा

By admin | Published: December 30, 2016 3:50 AM

नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेकांकडून तळीरामांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. यात अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे तळीराम चालकांना

मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेकांकडून तळीरामांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. यात अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे तळीराम चालकांना रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तळीराम चालकांकडून अपघात होऊ नये यासाठी बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटना एक पत्रच देण्यात आले आहे. यात तळीराम चालकांचे वाहन असल्यास त्यांना चालक द्या आणि वाहन नसल्यास टॅक्सी सेवा देण्यात यावी, अशी सूचना केली आहे. दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा असून प्रमाणापेक्षा जास्त दारू पिऊन वाहन चालवल्यास मोठा दंड व शिक्षेचीही तरतूद आहे. तळीराम चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत २0१५मध्ये १७ हजार ८४९ केसेस दाखल झाल्या होत्या आणि १ हजार ८२६ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. २0१६मधील जानेवारी ते जूनपर्यंत १२ हजार ४६६ केसेसची नोंद करतानाच २ हजार ६४२ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबरच्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांकडून तळीराम चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीमच हाती घेतली जाते. यंदाही जवळपास २00 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारंबे यांनी दिली. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहर पोलिसांसोबतच वाहतूक पोलीस असतील. त्याचप्रमाणे तळीराम चालकांना जरब बसावी आणि कठोर कारवाई करणे शक्य व्हावे यादृष्टीने मुंबई वाहतूक पोलिसांनी जीपीएस, कॅमेरासारख्या यंत्रणेसह नव्या ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ मशिन घेतल्या आहेत. जवळपास ५0 मशिन पोलिसांकडे असतील. तळीराम चालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटकडे आपला मोर्चा वळवला आहे. दारू पिऊन एखादा ग्राहक बारबाहेर आल्यास त्याला टॅक्सी सेवा देण्याची सूचनाच बार मालकांना पत्राद्वारे केली आहे. जर ग्राहकाचे वाहन असल्यास त्याला चालक देण्यात यावा, असेही सूचित केले असल्याचे भारंबे यांनी सांगितले. यामुळे अपघात होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल.