शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
4
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
8
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
9
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
10
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
11
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
12
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
13
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

"दोन वर्षांत एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या; संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक झाली"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 8:03 AM

विरोधक केवळ अफवा पसरवीत आहेत, फडणवीसांचा विधानसभेत आरोप

मुंबई - महायुती सरकार ७५ हजार सरकारी नोकऱ्या देणार, असे आम्ही जाहीर केले होते. आतापर्यंत ५७,४०० जणांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत, भरती प्रक्रिया पूर्ण झाली अन् आता कोणत्याही क्षणी नियुक्तीपत्रे दिली जातील, असे १९,८५३ जण आहेत आणि याशिवाय ३१,२०१ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दोन वर्षांत एक लाखांवर नोकऱ्या देण्याचा हा देशातील विक्रम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. 

काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी मृद व जलसंधारण विभागामार्फत झालेल्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. अपवादात्मक परिस्थितीत तसे घडले असले, तरी संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनेच झालेली आहे. काही लोक खोट्या नॅरेटिव्हद्वारे अफवा पसरवत आहेत. पुण्यात एक वेबसाइट आहे, ती हेच काम करते. असे खोटे पसरविणाऱ्यांविरुद्ध लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले. 

गट ‘क’ची पदभरती एमपीएससीमार्फत करणारराज्य सरकारी सेवेतील गट ‘क’ची पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्यात येतील. त्यासाठी एमपीएससीने अनुमती दिली आहे. राज्य सरकारनेही तसा निर्णय घेतला आहे.सरकारी पदभरती परीक्षेच्या वेळी निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असे फडणवीस म्हणाले.

भरती पुन्हा सुरू केलीपाचवा वेतन आयोग दिल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने राज्यात नोकरभरती बंद केलेली होती, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती सुरू करण्यात आली, याची आठवण फडणवीस यांनी विरोधकांना करून दिली. राजेश टोपे, आशिष शेलार, रोहित पवार आदी सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

पेपरफुटीसंदर्भात कायदा याच अधिवेशनातपेपरफुटीला आळा बसण्यासाठी केंद्राने कायदा आणलेला आहे. राज्याचा असा कायदा आणण्याचा मानस गेल्याच अधिवेशनात व्यक्त केलेला होता. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात हा कायदा निश्चितपणे आणला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा