शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

गोवा- मुंबई प्रवास होणार सहा तासांत

By admin | Published: September 22, 2016 6:58 PM

गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २२ : गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे जाहीर केला. येत्या दोन वर्षात हा निधी खर्च केला जाईल. तसेच गोवा-मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण व चौपदरीकरण केले जाणार असून त्यामुळे गोमंतकीय सहा तासांत मुंबईस पोहचू शकतील, असे गडकरी म्हणाले.

मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) आणि गोवा सी-पोर्ट प्रा. लिमिटेड यांच्यात गुरुवारी करारावर सही झाली. एमपीटीच्या आठ व नऊ क्रमांकाच्या धक्क्याच्या फेरविकासासाठी हा करार आहे. 1 हजार 145.36 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर येणार आहे. एमपीटीसाठी 2क्क् केव्ही क्षमतेच्या सौरउज्रेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा मिरामार येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, वीज मंत्री मिलिंद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, एमपीटीचे चेअरमन आय.जे. कुमार, सी-पोर्ट कंपनीचे संचालक अशोक कुमार, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी व्यासपीठावर होते.

गोव्यात महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून आठ किलोमीटरचा नवा महामार्ग बांधला जाईल. गोव्यात नवे बंदर उभे केले जाईल. मांडवी व जुवारी या दोन नद्या 31 ठिकाणी उसपल्या जातील. जलमार्ग यामुळे विकसित होतील व त्याचा लाभ गोव्याला होईल. एमपीटीने समुद्र उसपून बंदराची खोली 14 मीटरवरून 19 मीटरपेक्षा जास्त करण्याचे ठरविले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. एकूण वीस हजार कोटी रुपये आम्ही गोव्यासाठी खर्च करू. काही कामांसाठी गोवा सरकारकडून आम्हाला अजुन परवानगीची गरज आहे, असेही ते म्हणाले. गोव्याची वाहतूक हरित पद्धतीने व्हायला हवी. त्यासाठी सीएनजीचा वापर वाढावा म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करील.

गोव्यातील अपघातांच्या जागा सरकारने शोधून काढाव्यात. त्यावर उपाय काढण्यासाठी आम्ही निधी देऊ, असे गडकरी यांनी सांगितले. गोव्यातील बंदरांच्या विकासामुळे मच्छीमारांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनाही अर्थसाह्य करू व त्यामुळे ते 12 सागरी मैलांच्याही पलिकडे जाऊन मासेमारी करू शकतील. वास्को शहर व एमपीटीमध्ये जो वाद आहे, त्यावर योग्य तोडगा काढू. मच्छीमारांचे हित आम्ही जपू. गोव्यात जेटींचा विकास करू, असे गडकरी यांनी जाहीर केले.

मुंबईस पोहचा सहा तासांतगोवा- मुंबई महामार्गाचे चौपदीकरण केले जाणार आहे. पूर्ण काँक्रिटचा हा महामार्ग होईल. त्यामुळे वाहतुकीतील वेळ खूपच कमी होईल व गोमंतकीयांना सहा तासांत मुंबई गाठता येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. जलमार्ग, बंदरे व किनारपट्टी विकासासाठी देशभर सागरमाला प्रकल्प राबविला जाणार आहे. एकूण 12 लाख कोटींची गुंतवणूक त्यानिमित्ताने सागरी राज्यांमध्ये होईल. देशात सध्या दिवसाला आम्ही 22 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करत आहोत.

यापुढे 42 किलोमीटर प्रती दिन काम करण्याचे लक्ष्य आहे, असे गडकरी यांनी सांगितले. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर गोव्यात उभा करण्याचे सूतोवाचही गडकरी यांनी केले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गडकरी यांच्या कामाच्या वेगाची स्तुती केली. गडकरी यांच्यामुळे गोव्याला खूप लाभ होत आहे. जुवारी नदीवर नवा पुल यापुढे साकारणार आहे. पुलामुळे बांबोळीपासून वेर्णार्पयत नवे रस्ते अस्तित्वात येतील. पुलापेक्षाही जास्त खर्च या रस्त्यांच्या कामावर केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.