शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

जेवण करून जा, पण पाणी नका मागू ! मराठवाड्यात पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:27 IST

डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात

अंकुश वाघ

आडूळ (जि. औरंगाबाद) : डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षालाकेवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात. जेवण करून जा, पण पाणी नका मागू, असे सांगण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

आडूळ बुद्रुक मुख्य बाजारपेठेचे १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात पाच शासकीय टँकर सुरू आहेत. सार्वजनिक विहिरीत पाणी टाकले जाते आणि तब्बल २५ दिवसांआड नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वांना खासगी टँकरद्वारे दररोज ७० रुपये प्रति ड्रम व पाच रुपये प्रति हंडा दराप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका कुटुंबाला महिन्याकाठी फक्त पाण्यावर साधारण अडीच हजार रुपये लागतात. अनेक जण आठवडाभर विनाआंघोळीचे राहतात. आंघोळीचे पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाते.

पाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू असून ठेकेदाराला विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागत आहे. - शेख शमीम नासेर, सरपंच, आडूळ

खोडेगाव येथील डीएमआयसीचा पाणी पुरवठ्याचा पॉईंट सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल. - बळीराम कळमकर, ग्रामविकास अधिकारी, आडूळ

योजना रखडली२०१८ मध्ये दोन कोटी नऊ लाख रुपयांच्या मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. या कामाचा कार्यारंभ आदेशसुद्धा निघाला आहे. परंतु प्रशासन व ठेकेदारामुळे ही योजना रखडली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAurangabadऔरंगाबादWaterपाणी