शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

गोवा स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमधील कपात रद्द

By admin | Published: June 16, 2017 12:50 AM

गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र सरकारकडूनही सन्मान पेन्शन मिळू लागल्यानंतर त्यांना राज्य सरकारकडून दिल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र सरकारकडूनही सन्मान पेन्शन मिळू लागल्यानंतर त्यांना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान पेन्शमध्ये ७५ टक्के कपात करण्याचा राज्य सरकारचा १२ वर्षांपूर्वीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला.राज्य सरकारने या स्वातंत्र्यसैनिकांना किंवा त्यांच्या कुटुंबाला पूर्वीप्रमाणेच सन्मान पेन्शनची पूर्ण रक्कम देत राहावे आणि मध्यंतरीच्या काही काळात जास्त दिली गेलेली म्हणून कोणतीही रक्कम त्यांच्याकडून वसूल करू नये, असा आदेशही न्यायालयाने दिला.गोवा मुक्ती लढ्यात सहभागी झालेल्या व विदर्भात वास्तव्यास असलेल्या १४ स्वातंत्र्यसैनिकांनी आणि/ किंवा त्यांच्या वारसांनी सन २००५ मध्ये केलेली रिट याचिका अंतिम सुनावणीनंतर मंजूर करून उच्च न्यायालयाच्या न्या. रवी देशपांडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या नागपूर येथील खंडपीठाने हा निकाल दिला. न्यायालयाने सरकारचे पेन्शन कपात व वसुली हे दोन्ही निर्णय रद्द केले.ज्यांनी ही याचिका केली होती त्यांत गणपतराव छोटुजी गभाने, पार्वतीबाई शंकरराव बावनकर, मदनमोहन मुलताचंद आचार्य, सत्यनारायण चंद्रभूषण शुक्ला, पुंडलिक दौलतराव खंडागळे, रामभाऊ नारायण कोल्हे, भैयाजी पारसराव देशमुख, रामावतार रामलाल अवस्थी आणि वसंतकुमार अनंतराम चौरसिया (सर्व नागपूर), सीताराम विठ्ठलराव खडलोया, प्रल्हाद कृष्णराव रेभे, रंगराव श्यामराव देशमुख व भगवान शंकर गोरे (सर्व यवतमाळ जिल्हा) व गणेशप्रसाद योगेश्वरप्रसाद वाजपेयी (वर्धा) यांचा समावेश आहे. १२ वर्षांपूर्वी याचिका केली तेव्हाच यांची वये ७० व ८० च्या पुढे होती. त्यांची आजची प्रत्यक्ष वये लगेच स्पष्ट होऊ शकली नाहीत.