शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
3
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
4
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
5
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
7
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
8
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
9
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
10
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
11
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
12
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
13
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
14
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
15
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
16
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
17
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
18
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
19
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
20
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 2:03 PM

अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी' या विचार शिबिरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते...

आपल्याला पुढच्या पिढीसाठी एक विचार करावा लागेल, आता काहीही करून एक किंवा दोन आपत्त्यांवर थांबायला हवे. त्यासाठी कायदा करावा लागला तरी तो पंतप्रधान मोदींनी करावा. कुठल्याही जातीने, पंथाने, धर्माने कुणी काही सांगितलेले नाही, देवाने काही सांगितले नाही अल्लाहने काही सांगितले नाही की, कितीही मुलं जन्माला घाला म्हणून. एक किंवा दोन आपत्यांवर आपण थांबलो नाही, तर देशात अशी परिस्थिती निर्माण होईल, की पाणीही प्यायला राहणार नाही. घरांची व्यवस्था करता येणार नाही, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मांडले आहे. ते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी' या विचार शिबिरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते. 

याचवेळी समान नागरी कायद्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "समान नागरिकायद्यासंदर्भात एक गैसरमज आहे. माझ्या मागासवर्गीय, आदिवासींमध्ये, भटक्यांच्या मध्ये आहे. खरे तर यात आरक्षणाला कुठेही धक्का नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, समान नागरिकायदा म्हणजे, या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला कायदा सारखाच. आरक्षण वेगळं. ते तुमचं राहणारच. ते आरक्षण कुणीही काढू शकणार नाही." 

पवार म्हणाले, "माझे म्हणणे आहे की, समाननागरी कायद्यासंदर्भातही विचार करा. त्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांना काही तरी भूमिका घ्यावी लागेल. त्यात काही शंका, कुशंका त्रुटी वाटल्यास त्यावर चर्चा करू. चर्चेतून नेहमी चांगलेच बाहेर येते. पण पुढच्या पिढीचे काय भवितव्य आहे. यासंदर्भातही आताच्याच राज्यकर्त्यांनीच विचार करायला हवा. मागच्यांनी आपल्यासाठी हे केलं असतं तर कशाला ही वेळ आली असती, असे म्हणण्याची वेळे त्या बाबतीत येऊ द्यायची नाही. यात वेगवेगळे मत प्रवाह असू शकतात. मी हे चर्चेसाठी दिले आहे, असे सांगताना संजय गांधींच्या काळातील पाच कलमी कार्यक्रमाचाही उल्लेख केला."

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFamilyपरिवारUniform Civil Codeसमान नागरी कायदा