शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 14:06 IST

अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी' या विचार शिबिरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते...

आपल्याला पुढच्या पिढीसाठी एक विचार करावा लागेल, आता काहीही करून एक किंवा दोन आपत्त्यांवर थांबायला हवे. त्यासाठी कायदा करावा लागला तरी तो पंतप्रधान मोदींनी करावा. कुठल्याही जातीने, पंथाने, धर्माने कुणी काही सांगितलेले नाही, देवाने काही सांगितले नाही अल्लाहने काही सांगितले नाही की, कितीही मुलं जन्माला घाला म्हणून. एक किंवा दोन आपत्यांवर आपण थांबलो नाही, तर देशात अशी परिस्थिती निर्माण होईल, की पाणीही प्यायला राहणार नाही. घरांची व्यवस्था करता येणार नाही, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मांडले आहे. ते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी' या विचार शिबिरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते. 

याचवेळी समान नागरी कायद्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "समान नागरिकायद्यासंदर्भात एक गैसरमज आहे. माझ्या मागासवर्गीय, आदिवासींमध्ये, भटक्यांच्या मध्ये आहे. खरे तर यात आरक्षणाला कुठेही धक्का नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, समान नागरिकायदा म्हणजे, या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला कायदा सारखाच. आरक्षण वेगळं. ते तुमचं राहणारच. ते आरक्षण कुणीही काढू शकणार नाही." 

पवार म्हणाले, "माझे म्हणणे आहे की, समाननागरी कायद्यासंदर्भातही विचार करा. त्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांना काही तरी भूमिका घ्यावी लागेल. त्यात काही शंका, कुशंका त्रुटी वाटल्यास त्यावर चर्चा करू. चर्चेतून नेहमी चांगलेच बाहेर येते. पण पुढच्या पिढीचे काय भवितव्य आहे. यासंदर्भातही आताच्याच राज्यकर्त्यांनीच विचार करायला हवा. मागच्यांनी आपल्यासाठी हे केलं असतं तर कशाला ही वेळ आली असती, असे म्हणण्याची वेळे त्या बाबतीत येऊ द्यायची नाही. यात वेगवेगळे मत प्रवाह असू शकतात. मी हे चर्चेसाठी दिले आहे, असे सांगताना संजय गांधींच्या काळातील पाच कलमी कार्यक्रमाचाही उल्लेख केला."

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFamilyपरिवारUniform Civil Codeसमान नागरी कायदा