शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

यंदा उन्हाळा असणार अधिक दाहक

By admin | Published: April 02, 2016 4:06 AM

यंदा मान्सून चांगला बरसेल, अशी आनंददायक बातमी असली तरी त्याआधी उन्हाळ््याच्या अधिक दाहक झळा सोसाव्या लागणार आहेत. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात

पुणे : यंदा मान्सून चांगला बरसेल, अशी आनंददायक बातमी असली तरी त्याआधी उन्हाळ््याच्या अधिक दाहक झळा सोसाव्या लागणार आहेत. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशभरात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढणार असल्याचे यापूर्वीच हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्याचाच काहीसा अनुभव एप्रिलच्या पहिल्याच दिवसापासून येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागाला तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसू शकतो. एप्रिल ते जून या काळात देशभरात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) उपमहासंचालक डॉ. शिवानंद पै यांनी सांगितले. १९०१ पासूनचा उन्हाळ्याचा इतिहास पाहता २०१५ या वर्षी तिसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यंदा त्यापेक्षा अधिक विक्रमी तापमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे. असा घेतला जातो अंदाज...केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी आयएमडीच्या पुण्यातील कार्यालयाला भेट दिली. समुद्रातील वातावरण आणि वातावरण बदलासंबंधी मॉडेलचा अभ्यास करून उन्हाळ्याच्या तीव्रतेचा अंदाज दिला जातो. याच मॉडेलच्या आधारावर आयएमडीने दर पाच दिवसांनी उन्हासंबंधी सावधगिरीचा इशारा देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांपर्यंत योग्य मानला जाणार आहे.कमाल तापमान : कोल्हापूर (३८.७), नाशिक (३७.८), सांगली (४०.९), सोलापूर (४१.५), उस्मानाबाद (४०.१), औरंगाबाद (३८.४), परभणी (४१.७), अकोला (४१.२), नागपूर (४०.५).