शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

पोलिसांसाठी खुशखबर... राज्यात १ लाख घरे बांधणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:41 IST

गृहमंत्री अनिल देशमुख : सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयकडून अद्याप उत्तर नाही

औरंगाबाद : राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याची योजना असून राज्य सरकारकडून अर्थसाहाय्य न घेता ही योजना राबविली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी ‘लोकमत भवन’ येथे केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल सीबीआयकडे मागितला आहे, परंतु सीबीआयने त्यावर राज्य सरकारला अजूनही उत्तर दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी ‘लोकमत भवन’ला भेट दिली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.कोरोना काळात राज्यातील पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अतुल्य कामगिरी बजावली. यावर गृह विभागाने ‘अतुल्य हिंमत’  हे कॉफी टेबल बुक काढले आहे. त्याची प्रतही त्यांनी राजेंद्र दर्डा यांना भेट दिली.

जगभरात सायबर गुन्हे वाढत आहेत. ५ ट्रिलियन डॉलर एवढा हा व्यवहार आहे. ते रोखण्यासाठी मुंबईत ५ अद्ययावत सायबर गुन्हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. पोलीस दलात साडेबारा हजार शिपायांची भरती करायची आहे, आणि त्यापैकी ५,३०० पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही  गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी लवकरच ११२ क्रमांकअत्यावश्यक सेवा म्हणून लवकरच ११२ हा क्रमांक कार्यान्वित होईल. हा क्रमांक डायल करताच आणीबाणीच्या वेळी त्वरित पोलीस तेथे पोहोचतील. यासाठी जीपीएस यंत्रणा सज्ज असलेली दोन हजार चारचाकी, तर अडीच हजार दुचाकी वाहने खरेदी केली जातील. यामुळे राज्यभरात ही अत्यावश्यक सेवा मदतीसाठी पोहोचू शकते.  यामुळे कायदा-सुरक्षा बळकट होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावात शहीद पोलिसांच्या कुटुंबांना मदतकोरोनाच्या काळात पोलीस दलाने अतिशय महत्त्वपूर्ण काम केले. कायदा व सुव्यवस्थेसोबतच परप्रांतीयांना आपल्या घरी परत पाठविण्यासाठी मदत केली. यात कोरोना प्रादुर्भावात ३३० पोलीस शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६५ लाख रुपयांची मदत सरकारने केली आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

अर्णब चॅट प्रकरणी केंद्र सरकारने खुलासा करावा  बिहारमधील निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्राने अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला; परंतु सात महिने उलटले तरी तपास लागला नाही. उलट टीआरपी घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांकडून तंत्रशुद्ध पद्धतीने चालू आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या चॅटमधून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अतिसंवेदनशील माहिती उघड झाली असून ती अर्णबपर्यंत कशी पोहोचली, याचा खुलासा केंद्र सरकारने केला पाहिजे, असेही देशमुख म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखRajendra Dardaराजेंद्र दर्डाLokmatलोकमत