शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

धनगरांनी प्रत्येक कार्यक्रमात काठीऐवजी कुऱ्हाड द्यावी; आरक्षणप्रश्नी गोपीचंद पडळकर आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 3:21 PM

...म्हणून पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे, असे सांगत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा टीका केली.

Gopichand Padalkar: महाराष्ट्रात धनगर जागर यात्रा सुरू झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशनंतर आता ही यात्रा कोकणात जाणार आहे. मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षणाचा प्रश्नही आक्रमकपणाने मांडला जात आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत दौरे करत आहेत. यावेळी धनगरांनी प्रत्येक कार्यक्रमात काठीऐवजी कुऱ्हाड द्यावी, असे आवाहन समाज बांधवांना केले आहे. 

राज्यातील धनगर समाजाला जागरूक करण्यासाठी या धनगर जागर यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. आमच्या जुन्या नेतेमंडळींनी यासाठी प्रयत्न केला आहे. दोन टप्प्यावर आमची लढाई सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधिनी विचारमंचाच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली आहे. १७० पुरावे देण्यात आले आहेत. राज्य सरकारने तीन प्रतिज्ञापत्र धनगर समाजाच्या बाजूने दिलेली आहेत. डिसेंबर महिन्यात या याचिकेवर निकाल येणार आहे. हा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातील धनगर समाजाला रस्त्यावरील लढाईला तयार करण्यासाठी जागर यात्रा

न्यायालयाचा निकाल धनगर समाजाच्या बाजूने येईल. मात्र, त्यात काही अडचण आली तर रस्त्यावरील लढाईसाठी धनगर समाजाने तयार राहावे, यासाठी ही जागर यात्रा काढली जात आहे. धनगर समाजाने एसटी आरक्षणासाठी मागणी केलेली नव्हती. तर एसटी अंमलबजावणीची होती. परंतु, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा आमच्या नेत्यांनी पहिल्यांदा धनगर समाजात चळवळ उभी केली आणि जाणीव करून दिली. धनगर समाज आता जागा होऊ लागला आहे, हे शरद पवार यांच्या लक्षात आले. एसटी आरक्षणाची मागणी केली जात आहे. ही मागणी मान्य झाली तर प्रस्थापितांचे राजकारण धोक्यात येईल. म्हणूनच संविधानात नसलेले आणि कोणत्याही राज्याने दिले नसलेले एनटीचे आरक्षण नव्याने काढले आणि ते धनगरांना दिले, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. 

...म्हणून पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे

ओबीसीच्या २७ टक्क्यांमधील ११ टक्के आरक्षण बाजूला केले आणि भटक्या जमातींना दिले. यामध्ये आमचे प्रचंड नुकसान आहे. आमचे मेरिट ओपनच्या मेरिटच्या बरोबर लागते. कधीकधी ते ओपनपेक्षा जास्त लागते. नाहीतर दोन मार्कांनी मागे असते. मग आमचा फायदा काय झाला. आम्हाला त्यातून काय मिळाले. आमच्या लोकसंख्येप्रमाणे काही मिळाले नाही. म्हणूनच पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे, असे पडळकर यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कुऱ्हाड हे आमचे प्रतिक आहे. आमच्या सगळ्यांच्या हातात कुऱ्हाड असते. कुऱ्हाडीशिवाय आमचे जीवन असू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातील धनगर समाजाला आवाहन केले की, पुढच्या काळात धनगरांनी कार्यक्रमात घोंगडे आणि काठी, काठीऐवजी कुऱ्हाड द्यावी. हे अन्यायाविरोधातील प्रतिक आहे. अन्यायाविरोधात लढण्याची भूमिका पहिल्यापासून धनगरांची आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकर