शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मंगल कार्यालय मिळवून दिल्यामुळे घोडीचा पाडा ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार

By admin | Published: October 04, 2016 5:00 PM

जव्हार आदिवासी विकास प्रकल्पामध्ये १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून विक्रमगड तालुक्यातील खुडेद - घोडीचा पाडा येथील मंगल कार्यालयाचे

- राहुल वाडेकर/ऑनलाइन लोकमत

विक्रमगड, दि.04 - जव्हार आदिवासी विकास प्रकल्पामध्ये १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून विक्रमगड तालुक्यातील खुडेद - घोडीचा पाडा येथील मंगल कार्यालयाचे काम न करता १० लाखाचे बिल परस्पर काढल्याची तक्रार शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष व पत्रकार शरद पाटील यांनी पुराव्यांनिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची चौकशी होऊन शरद पाटील यांनी केलेले आरोप सिद्ध झाल्याने या गावामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मंगल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले. या इमारतीचे बांधकाम शरद पाटील यांच्या पाठपुराव्याने व त्यांच्या निर्भीड लेखणीमुळे झाल्याने घोडीचा पाडा ग्रामस्थांनी त्यांचा मंगल कार्यालयाच्या इमारतीसमोर सत्कार केला. 

येथील   मंगल कार्यालयाची इमारत चोरीला गेल्याचे' सविस्तर वृत्त छापले होते. दि. १४ सप्टेंबर रोजी त्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिले व रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर दि. १७ सप्टेंबर रोजी तातडीने या मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरु झाले व दि. २९ सप्टेंबर रोजी ते पूर्ण झाले. मात्र या इमारतीचे ९ लाख ९९ हजार ५३० रुपयांचे बिल दि. १५ मार्च २०१६ रोजी काढले होते व इमारत पूर्ण झाल्याचा खोटा अहवाल सादर केला होता. त्यासंदर्भात आवाज उठवताच तातडीने हालचाली झाल्या व अवघ्या १३ दिवसांमध्ये या इमारतीचे काम पुर्ण झाले. 
यावेळी झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील १२ पाडयांतील शेकडो ग्रामस्थ हजर होते. या ग्रामस्थांनी इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला तर गावातील महिलांनी शरद पाटील यांचा यथोचीत सन्मान केला. यावेळी बोलताना ग्रामस्थ रामू भोये यांनी सांगितले की, 'गावामध्ये मंगल कार्यालयाची इमारत होणार आहे. हे आम्हाला माहीतीही नव्हते. मात्र शरद भाऊ गावामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला सावध केले. त्यांनीच आमच्या आदिवासींचे पैसे खाणाऱ्या ठेकेदारांना धडा शिकविला. आता आमच्या गावाचे पैसे खाण्याची कुणी हिंमत करणार नाही'. तर आदिवासी विदयार्थी कृती समितीचे अध्यक्ष लहु नडगे यांनी सांगीतले की, 'आदिवासी बांधवांच्या अनेक योजना भ्रष्टाचाऱ्यांनी हडप केल्या आहेत. आम्ही सगळ्यांकडे तक्रारी करतो, पण कुणीच दखल घेत नाही. शरदभाऊ मात्र आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. त्यांच्यामुळेच गावाला चांगली इमारत मिळाली.'
दरम्यांन या इमारत चोरी प्रकरणी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री. माळी यांनी या भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात लेखी पत्र विक्रमगड व जव्हार पोलीसांना दिले आहे.