शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

सरकारची दोनदा वर्षपूर्ती !

By admin | Published: December 03, 2015 4:06 AM

राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने आपला सवतासुभा कायम ठेवला आहे. त्यामुळे एकाच सरकारची दोनदा वर्षपूर्ती, अशी अजब घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.शिवसेनेने आपल्या ‘सत्तेचा’ वर्षपूर्ती समारंभ गुरुवारी रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, शिवसेनेच्या दहा मंत्र्यांच्या कार्यपुस्तिकांचे प्रकाशन होणार आहे. यासाठी शिवसेनेने केलेल्या जाहिरातीत बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दहा मंत्र्यांचे फोटो छापले आहेत. ‘आमच्यात कोणताही वाद नाही, जर शिवसेनेचे मंत्री नाराज असते, तर त्यांनी आपली नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवली असती,’ असे सांगणारे भाजपा नेते शिवसेनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. कदाचित शनिवारी शपथविधी !मंत्रिमंडळाचा गुरुवारी विस्तार होणार नाही, ही माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनीच ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, नागपूर अधिवेशनाच्या आधी विस्तार होऊ शकतो, असे सांगत विस्ताराबाबतची उत्सुकता कायम ठेवली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कदाचित शपथविधी होऊ शकतो. त्यात एखाद्या विद्यमान मंत्र्याची घरवापसी होऊ शकते व काहींची खाती बदलली जाऊ शकतात. शिवसेनेने त्यांची दोन नावे तयार ठेवल्याचे समजते.वर्षपूर्तीनिमित्त काढल्या जाणाऱ्या अहवालासाठी सेनेने प्रस्तावना मागितल्याची माहिती, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ‘लोकमत’ला दिली. आपण अद्याप प्रस्तावना दिलेली नाही, पण कदाचित आज लिहून देईन, असेही ते म्हणाले. - ‘सेनेच्या वर्षपूर्तीविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, आपण पेपर वाचलेला नाही,’ असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मात्र, खा. अनिल देसाई यांच्यासोबत विधानपरिषदेच्या जागांबद्दल बैठक झाल्याचे ते म्हणाले.- फडणवीस सरकारने ३१ आॅक्टोबरला वर्षपूर्ती साजरी केली, त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘आम्हाला कुठे वर्ष पूर्ण झाले?’ असे सांगत त्या सोहळ्यातून अंग काढून घेतले होते. भाजपा-सेनेचे जागावाटप : विधान परिषदेच्या आठ जागांसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सेनेचे खा. अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. यातील मुंबई, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि अहमदनगर अशा तीन जागा शिवसेना तर उर्वरित पाच जागा भाजपा लढविणार आहे.