शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:42 IST

पाथरी येथील श्री साई जन्मभूमी विकास कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी काही शासकीय दस्ताऐवज जाहीर केले आहेत.

- विठ्ठल भिसेपाथरी (जि़ परभणी) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा यांची जन्मभूमी पाथरीच असल्याचे २९ पुरावे समोर आल्यानंतर आता १९६७ मधील परभणी जिल्ह्याचे राज्य शासनाचे  इंग्रजी गॅझेट व पाथरी नगरपालिकेच्या मालमत्ता नोंदणी वहीतही श्री सार्इंची जन्मभूमी पाथरीच असल्याचे दस्तावेज समोर आले आहेत़पाथरी येथील श्री साई जन्मभूमी विकास कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी काही शासकीय दस्ताऐवज जाहीर केले आहेत़ त्यानुसार १९६७ मध्ये राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचे पहिलेच इंग्रजीमध्ये गॅझेट प्रसिद्ध केले़ या गॅझेटमध्ये देखील श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी असल्याची नोंद आहे़ त्यामध्ये श्री साई बाबा यांचा जन्म पाथरीतील भुसारी कुटुंबात झाला असून, ते पाथरीतून सेलूला गेले़ तेथे त्यांनी सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांना आपले गुरु मानले़ सेलूत केशवराज बाबासाहेब महाराज यांचे मंदिर असून, त्यांचा काळ १७१५ ते १८०९ असा आहे, अशी गॅझेटमध्ये नोंद आहे. याशिवाय शिर्डी येथील संस्थानचे एकेकाळचे विश्वस्त विश्वास खेर यांनी १९७५ मध्ये श्री सार्इंचा पाथरी येथे जन्म झाल्याचे संशोधन केले़ त्यानंतर पाथरी नगरपालिकेने १९७७-७८ ते १९८०-८१ मध्ये श्री साई बाबा यांचे वंशज अण्णासाहेब भुसारी यांच्या नावे असलेल्या घराचे श्री साई स्मारक समिती असे जावक क्रमांक ११५१/८०दि़२२ जानेवारी १९८० अन्वये नामांतर केले असल्याची नोंद आहे़ त्यावेळेसपासून ही नोंद कायम आहे़ नगरपालिकेच्या कागदपत्रांमध्येही पाथरीच श्री सार्इंचे जन्मस्थळ असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे़ त्यामुळे पाथरीकरांच्या दाव्याला बळ मिळाले आहे़शिर्डीकरांनी मोठेपणा दाखवावा - दुर्राणीपाथरी येथील श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळास शिर्डी येथील विश्वस्त व नागरिकांनी केलेल्या विरोधाचे मूळ हे तेथील अर्थकारणच असल्याचे दुर्राणी यांनी सांगितले़ साई चरणी कोट्यवधी भाविक मनोभावे विविध माध्यमातून देणगी देतात़त्या अनुषंगाने २०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षांच्या कालावधीत श्री साई संस्थानचे २ हजार ६३५ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न होते़ त्यामधील १ हजार ६९३ कोटी २० लाख रुपये संस्थानने खर्च केला़ उर्वरित ९४२ कोटी ७ लाख रुपये संस्थानने बँक डिपॉझिट केले़ या अर्थकारणाला फटका बसण्याची भीती शिर्डीकरांना वाटते़ म्हणूनच ते सत्य नाकारून पाथरीला विरोध करीत आहेत, असे दुर्राणी यांनी सांगितले. शिर्डीकरांनी पाथरीला विरोध न करता मोठ्या मनाने या जन्मस्थळाचा विकास होण्यासाठी उदार भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले़

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर