शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शासकीय धान्य वाहतुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 2:26 AM

वाहतूकदारांच्या दरात शासनाने दुपटीने वाढ केल्यामुळे अन्नधान्य महामंडळातून थेट रेशन दुकानदाराच्या दारापर्यंत धान्य वाहतुकीचा

नाशिक : वाहतूकदारांच्या दरात शासनाने दुपटीने वाढ केल्यामुळे अन्नधान्य महामंडळातून थेट रेशन दुकानदाराच्या दारापर्यंत धान्य वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून, यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा खात्याने घेतलेल्या निर्णयामुळे रेशनचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.दोन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपये किमतीच्या धान्य घोटाळ्यानंतर शासनाने रेशनचे धान्य वाहतूकदारांच्या मुसक्या आवळल्याने राज्यात शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने धान्य वाहतूक करण्यास नकार देत काम बंद केले होते. अल्प वाहतूक दर मिळत असल्याचे सांगत शासकीय धान्याची वाहतूक करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य वाटपात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून खासगी वाहतूकदारांकडून तर काही ठिकाणी थेट आरटीओमार्फत वाहने अधिग्रहित करून दर महिन्याच्या धान्याची वाहतूक सुरू करण्यात आली. शासकीय गोदाम अथवा अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातून थेट रेशन दुकानापर्यंत अन्नधान्याची वाहतूक करण्यासाठी शासकीय पातळीवर वेळोवेळी निविदा मागविण्यात आल्या, परंतु अत्यंत अल्प दर व जाचक नियम, निकषांमुळे निविदा भरण्यास वाहतूकदारांनी अनुत्सुकता दर्शविल्याने एकाही जिल्ह्यात वाहतूकदार धान्य वाहतुकीसाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे दर वाढवून द्यावेत याबाबत शासकीय पातळीवर बऱ्याच महिन्यांपासून विचार केला जात होता. अखेर गेल्या आठवड्यात शासनाने निर्णय घेऊन वाहतूक दरात दुपटीने वाढ केली. वाहतूकदारांना काही नियम व निकषही लागू केले आहेत. (प्रतिनिधी)