शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

‘ओबीसीच्या यादीतून एखाद्या समाजाला वगळण्याचा अधिकारही सरकारला आहे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 06:23 IST

सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे एखाद्या समाजाला इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) अंतर्गत सरकार आरक्षण देत असेल तर त्या समाजाची प्रगती झाल्यानंतर त्या समाजाला ‘ओबीसी’च्या यादीतून वगळण्याचा अधिकारही राज्य सरकारला आहे.

मुंबई : सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे एखाद्या समाजाला इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) अंतर्गत सरकार आरक्षण देत असेल तर त्या समाजाची प्रगती झाल्यानंतर त्या समाजाला ‘ओबीसी’च्या यादीतून वगळण्याचा अधिकारही राज्य सरकारला आहे. मात्र, आपल्याकडे असे क्वचितच घडते. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देणे भाग पडत आहे. परंतु, भविष्यात ही स्थिती बदलेल. राज्य सरकार ओबीसीमध्ये समाविष्ट असलेल्या समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेऊन ५० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण देण्याची नामुष्की ओढावून घेणार नाही, अशी आशा आम्ही करत आहोत, असे निरीक्षण उच्च न्यायालयानेमराठा आरक्षण वैध ठरवताना नोंदविले.न्या. एम. जी गायकवाड समितीने मराठा समाज समाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे दाखवत ही अपवादात्मक स्थिती असल्याचे अहवालात म्हटले आहे. गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारत राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षण वैध ठरविताना उच्च न्यायालयाने वर्षानुवर्षे ओबीसींच्या यादीत वाढ होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्गाची नियुक्ती केली. स्वत:ला मागास म्हणवून घेणाऱ्या समाजाचा सखोल अभ्यास करून त्या समाजाला आरक्षण देणे योग्य आहे की नाही, याबाबत हा आयोग निर्णय घेतो. त्याचप्रमाणे एखाद्या मागास समाजाची प्रगती झाली असल्यास त्याचा अभ्यास करून त्या समाजाला ओबीसीच्या यादीतून वगळण्याबाबतही आयोग निर्णय घेऊ शकतो.सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी घटनाकारांनी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्याचबरोबर समान प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, हाही आरक्षण देण्यामागे उद्देश होता. मात्र, त्याचा विचार करण्यात आला नाही. राज्य सरकारला ओबीसीमधील यादीचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.दर १० वर्षांनी आरक्षण दिलेल्या समाजाचा बदलता सामाजिक व आर्थिक स्तर अभ्यासून राज्य सरकारने त्या समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे की नाही, हे पाहून त्या समाजाचे आरक्षण काढण्याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. यामुळे राज्य सरकार ५० टक्क्यांची मर्यादा पाळू शकेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार