शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

वीज सुविधांचा ६५ करोडचा प्रस्ताव शासनदरबारी सादर!

By admin | Published: July 21, 2016 6:06 PM

सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी महावितरणने ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार केला.

सुनील काकडे

वाशिम : सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी महावितरणने ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार केला. त्यास मुंबईच्या ह्यडिस्ट्रीब्युशनह्ण विभागाने मंजूरात देवून अंतीम निर्णय आणि निधीसाठी शासनदरबारी हा प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, निधी प्राप्त होताच अकराही बॅरेजेसस्थळी विजेच्या सुविधा उभ्या केल्या जातील, अशी माहिती अधीक्षक अभियंता बी.आर.बनसोडे यांनी गुरूवार, २१ जुलै रोजी दिली.जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर तब्बल ७१६.४२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अकराही बॅरेजेसची कामे सद्या पूर्ण झाली असून त्यात मोठा जलसाठा देखील निर्माण झाला आहे. या प्रकल्पांमुळे वरूड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळी, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर या पैनगंगा नदीकाठच्या गावांमधील सुमारे १० हजार शेतकऱ्यांना खरिप, रबी हंगामासह उन्हाळी पिकांकरिता देखील पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहणार आहे.

तथापि, एकीकडे सिंचनाच्या बाबतीत आशादायक वातावरण निर्मिती झाली असताना दुसरीकडे मात्र प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात उद्भवलेल्या विजेच्या समस्या वाढतच चालल्या होत्या. पाणी उपलब्ध असले तरी त्याचा वापर सिंचनाकरिता करायचा झाल्यास कृषीपंपांना पुरेशी वीज मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यानुषंगाने अकराही प्रकल्पक्षेत्रात वीज उपकेंद्र उभारून ठिकठिकाणी रोहित्रांची उपलब्धी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.

तद्वतच हा प्रश्न निकाली निघावा, यासाठी ह्यलोकमतह्णनेही वेळोवेळी सकारात्मक लिखान केले. त्याची दखल घेत महावितरणने बॅरेजेस प्रकल्प परिसरात विजेच्या भौतिक सुविधा उभ्या करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार करून महावितरणच्या ह्यडिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटह्णकडे पाठविला.  तेथून या प्रस्तावाला ह्यहिरवी झेंडीह्ण मिळाली असून आता शासनाच्या अंतीम मंजूरीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. तथापि, जिल्ह्यातील विद्यमान खासदार, आमदारांनी शासनाकडून हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून अपेक्षित निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.