शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गोविंदांसाठी सरकारची पुनर्विचाराची ‘हंडी’

By admin | Published: August 14, 2014 9:57 AM

दहीहंडी उत्सवाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्र्यांची माहिती : उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका करणारमुंबई : दहीहंडी उत्सवाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, दहीहंडीची उंची तसेच बालगोविंदांच्या सहभागाबात नियमावली तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र याबाबत नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्या इतपत अवधी नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.दहीहंडी उत्सवातील अपघात आणि लहान बालकांच्या जीविताला असणारा धोक लक्षात घेत न्यायालयाने १८ वर्षांखालील गोविंदांवर बंदी घातली. तसेच दहीहंडीच्या उंचीवर २० फुटापर्यंतची मर्यादा घातल्याने गोविंदा पथके, दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने याप्रश्नी तोडगा काढावा अन्यथा कोणत्याही परिस्थितीत दहीहंडीची परंपरा पाळू. आयोजक जेवढ्या उंचीवर हंडी बांधतील तेवढे थर लावण्यात येतील, असा इशारा दहीहंडी सार्वजनिक उत्सव समन्वय समितीने दिला होता. (प्रतिनिधी)

निर्बंध लावणे अवघडदहीहंडीसारख्या धार्मिक उत्सवावर निर्बंध लादणे अवघड असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. मात्र गोविंदा पथकांनी १२ वर्षांखालील मुलांचा आपल्या पथकात समावेश करू नये, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी या वेळी केले.