शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरकारने ईव्हीएमचा हट्ट सोडावा - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:20 IST

पालघर आणि भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीत इव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी

मुंबई : पालघर आणि भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीत इव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मतदानाचा खोळंबा झाला. लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या सर्व घटनांमुळे लोकांच्या मनात ईव्हीएम मशिनबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपा सरकारने ईव्हीएमचा हट्ट न धरता, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुका आणि आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम आदी नेते उपस्थित होते. पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनमधील बिघाडाबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भंडारा-गोंदियाप्रमाणेच पालघर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने अनेक ठिकाणी मतदान खोळंबले. मात्र, अशा ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले नाही. पालघरमध्ये मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशिन खासगी कारमधून नेण्यात आल्या. हा गंभीर प्रकार आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा काय करतेय, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. निवडणूक निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात झाली का, याविषयी शंका आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेते लवकरच दिल्लीला जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर सगळीकडे केल्याचे सर्व घटनाक्रमांवरून दिसून येत आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.आगामी विधानपरिषद निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. बुधवारी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, तसेच शरद यादव यांच्या पक्षासमवेत चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी होणारी निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यापेक्षा राज्यसभेप्रमाणे खुल्या मतदान पद्धतीने घ्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच शिवसेना-भाजपा युती न झाल्यास काँग्रेसला फायदा होईल, असे विधान केले होते. याबाबत बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे, असा टोला अशोक चव्हाण यांनी हाणला.