शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

निवृत्तांना शासन घेणार मानधनावर

By admin | Published: January 08, 2016 3:39 AM

विशिष्ट कामांसाठी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीने विशिष्ट काळासाठी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यांना कमाल ४० हजारांपर्यंत मानधन मिळणार

मुंबई : विशिष्ट कामांसाठी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीने विशिष्ट काळासाठी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यांना कमाल ४० हजारांपर्यंत मानधन मिळणार असून त्यांसाठी वयोमर्यादा ७० वर्षे असेल.राज्य शासनाच्या काही विभागांत सध्या पदभरती होत नसल्याने विशिष्ट कामांसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेतल्यास अशा विभागाचे कामकाज सुसह्य होण्यास मदत होऊ शकेल. त्यादृष्टीने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांचे पॅनेल तयार केले जाईल. त्याचा दरवर्षी आढावा घेण्यात येईल. त्यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी देऊन प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. या कामासाठी लागणारी विशेष अर्हता आणि संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. पदे सेवा प्रवेश नियमानुसार भरण्यात येतील, त्यामुळे सरकारमधील नियमति पदभरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. विशेष कौशल्य धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी मंजूर पदसंख्येच्या कमाल १० टक्के पदे करार पद्धतीने भरण्यात येतील. करार पद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप, आकस्मिकता, सार्वजनिक हित या बाबी विचारात घेण्यात येणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)निवृत्तीनंतर नियुक्ती देताना कर्मचारी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे की नाही हे बघितले जाईल. स्वेच्छासेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना संधी दिली जाणार नाही. नेमून दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठीचे हमीपत्र घेण्यात येणार आहे. विभागीय चौकशी सुरू असलेल्यांनादेखील संधी दिली जाणार नाही.एकावेळी एकाच वर्षाचा करार केला जाईल आणि गरज भासल्यास त्याचा कालावधी वाढविला जाईल. नियुक्त प्राधिकाऱ्याला एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचा अधिकार असेल. या नियुक्त्यांमुळे सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर परिणाम होणार नाही.