शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

​५ ते १४ आॅक्टोबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे सरकारचे आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 20:21 IST

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केले. 

मुंबई  - मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केले. परतीच्या पावसाचा हा काळ आहे. वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. खरीपाच्या पिकावर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसु शकतो. शेतमालाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे. मुंबईसह कोकणातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याचेही फुंडकर यांनी सांगितले.  याकाळात वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वत: चा आणि जनावरांचा विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली तसेच विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ वीज कोसळण्याच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे पावसाच्या काळात असा ठिकाणी थांबू नये. कृषीविभागाकडून शेतक-यांना एसएमएसद्वारे अतिवृष्टीबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच पालकमंत्र्यांनाही आपापल्या जिल्ह्यात याबाबत आवाहन करण्यास सांगण्यात आल्याचेही फुंडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPandurang Phundkarपांडुरंग फुंडकर