शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जीएसटीच्या आडून सरकारवर टीकास्त्र

By admin | Published: May 22, 2017 12:43 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा कारभार उत्तम चालू असल्याच्या ‘परसेप्शन’ला छेद देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रविवारी

अतुल कुलकर्णी  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा कारभार उत्तम चालू असल्याच्या ‘परसेप्शन’ला छेद देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रविवारी तडाखेबाज भाषणातून केले. राज्य सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभाराची चिरफाड करत त्यांनी जीएसटीसाठीच्या विशेष अधिवेशनाचा राजकीय फायदा उठवला. भाजपामधील काही अस्वस्थ सदस्यांनी पाटील यांच्या भाषणाला जोरदार दाद दिली, तर शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी जोरदार भाषण होत असल्याचे इशारे विरोधी बाकावरील सदस्यांना केल्याने तर सत्ताधारी सदस्य त्रस्त झाले.जयंत पाटील यांनी तब्बल ३ तास भाषण केले. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते परवा भाजपात आलेल्या रामकृष्ण बोर्डीकर यांच्यासह अनेकांना फटके लगावले. जयंतरावांना भाषणासाठी ‘ओपनिंग’ला पाठविणे, ही विरोधकांची रणनिती होती. ‘जीएसटी’साठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाची संधी साधून सरकारवर हल्लाबोल करायचा, असा डावपेच आखून ही फटकेबाजी केली गेली.विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे सोमवारी सरकारवर तुटून पडणार आहेत. एका दिवशी, एकाच नेत्याने सरकारवर हल्ला चढवायचा, असे ठरवून विरोधक अधिवेशनात या उतरले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वक्तृत्व गुण नसलेल्या विधानसभेतील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कामकाजावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध करत सरकारच्या विरोधात बोलण्याची चालून आलेली संधी सोडायची नाही. असे सांगत तो प्रस्ताव बाजूला ठेवला. मुख्यमंत्र्यांनी राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खाते दिल्यानंतरही त्यांनी ते कसे स्वीकारले, मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रामुळे राज्यात एकही मोठा प्रकल्प सुरु झालेला नाही. मुख्यमंत्री गाळ काढण्याचे कामे पाहात फिरत आहेत. ज्या बोर्डीकर यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केले होते, त्यांना पक्षात प्रवेश कसा दिला? अशा एक ना अनेक विषयावरून पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.हे तर खर्चमंत्री!केंद्राने नियोजन आयोग संपवला व नीती आयोग आणला. राज्याने प्लॅन, नॉनप्लॅन असे दोन्ही बजेट एकच करुन टाकले व नियोजन विभाग संपवला. त्यामुळे अर्थ व नियोजन असे मंत्रीपद सांभाळणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडचे नियोजन खाते संपुष्टात आले. आता जीएसटीमुळे कर लावण्याचे अधिकारही संपल्यामुळे त्यांच्याकडील अर्थ खात्यातही काही अर्थ उरला नाही. त्यामुळे आता ते फक्त खर्च करणारे ‘खर्चमंत्री’ राहिलेत! जयंत पाटलांच्या या कोपरखळीला सत्ताधारी बाकावरूनही दाद मिळाली.श्रेय मनमोहन सिंग यांचेचजीएसटी, कर्जमाफी, आधार कार्ड, स्मार्ट सीटी, लाभार्थ्यांना थेट लाभ देणे, इस्त्रोमध्ये गुंतवणूक अशा सगळ्या योजना तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच काळातील. मोदी सरकार फक्त श्रेय घेण्याचे काम करत आहे, असे सांगत पाटील यांनी कोण-कोणत्या योजना मनमोहनसिंग यांच्या काळात झाल्या त्याची यादीच वाचून दाखवली.