शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

वाझे प्रकरणावरून सरकारचे डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:00 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, अनिल परब आदी उपस्थित होते.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक या घटनाक्रमावरून राज्य सरकार कोंडीत सापडल्याचे चित्र असतानाच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी झाली. त्यात सरकारच्या डॅमेज कंट्रोलबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, अनिल परब आदी उपस्थित होते.

 एनआयएच्या तपासात बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे सरकारभोवती संशयाचे धुके अधिकच गडद होत आहे. याबद्दल समन्वय समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, माध्यमातून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याबाबतच्या रणनीतीवर विचार झाला, अशी माहिती आहे.

संपूर्ण तपास झाल्यानंतर आणि निष्कर्षाप्रत ल्यानंतरच एनआयएने त्यासंदर्भात बोलावे. प्रकरणाचा संपूर्ण छडा लागल्यानंतर अधिकृतपणे माध्यमांसमोर यावे, असे मत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

भाजपचा हल्लाबोल- प्रदेश भाजपने दिवसभर ट्विटवर ट्विट  करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळले, त्याचे काय झाले? पालघरमधील साधूंचे मारकरी मोकाट फिरत आहेत, संजय राठोड यांच्यावर अद्याप कारवाई नाही, तुम्ही नेमके काय केले, असे सवाल भाजपने केले आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेsachin Vazeसचिन वाझेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा