शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

शाहीस्नानसाठी पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर

By admin | Published: December 23, 2016 4:53 AM

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. हा निर्णय जलधोरण

मुंबई : सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. हा निर्णय जलधोरण २००३च्या अगदी विसंगत आहे, असा निर्णय गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला.सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा आदेश मुख्य सचिवांनी २८ जानेवारी २०१६ रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तथापि, हा आदेश जलधोरण २००३शी विसंगत असल्याने तो बेकायेशीर ठरतो, असे न्या. अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले.दुष्काळी स्थितीत पाणी कशाप्रकारे सोडण्यात यावे, याबद्दलचा तपशील जलधोरण २००३मध्ये देण्यात आला आहे. पिण्यासाठी, दैनंदिन कामासाठी, शेतीसाठी, औद्योगिक कामाकरिता व त्यानंतर धार्मिक कारणासाठी पाणी सोडण्यात यावे, असे या धोरणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीही राज्य सरकारने दुष्काळी स्थितीत पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसतानाही नाशिकच्या गंगापूर धरणातून कुंभमेळ््यातील शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याचा आदेश दिला. या आदेशाला नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.देसरडा यांनी राज्य सरकारची जलयुक्तशिवार योजनाही योग्य पद्धतीने राबवली जात नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सरकारच्या या योजनेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांनाही हानी पोहचत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने यात आम्ही तज्ज्ञ नसल्याने राज्य सरकारकडे निवेदन करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना दिले. याचिकाकर्ते म्हणत असतील त्याप्रमाणे खरोखरच वैज्ञानिक पद्धतीने जलशिवार योजना राबवण्यात येत नसेल तर खरोखरच हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी एक समिती नेमावी. दुष्काळमुक्त राज्य निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)