शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

ग्रामपंचायती संगणकाने जोडणार

By admin | Published: January 03, 2017 4:54 AM

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत संगणक प्रणालीने जोडणार, तसेच राज्यात २०१९ पर्यंत कोणीही बेघर राहणार नाही

पनवेल : महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत संगणक प्रणालीने जोडणार, तसेच राज्यात २०१९ पर्यंत कोणीही बेघर राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी खारघर येथे केले. खारघर सेक्टर २१ मध्ये सिडकोने बांधलेल्या ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. राज्याच्या विकासात ग्रामीण भागाचा सहभाग महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवारसारख्या योजनांचे अनुकरण इतर राज्ये करीत आहेत. ग्रामीण भागात रस्ते झाल्यास गावात उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा पोहोचतील. दोन वर्षांत १७ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे १५ हजार विद्यार्थी खासगी शाळेतून जिल्हा परिषदेकडे वळले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. प्रत्येक जिल्ह्यात बचत गट, मॉल सुरू झाले पाहिजेत, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ‘खेड्यांकडे चला’ हा गांधीजींचा मंत्र प्रत्यक्षात उतरायला ७ दशके लागली. ३०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना ग्रामविद्युत सेवक दिले आहेत, तसेच खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी स्मार्ट ग्रामयोजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. कार्यक्रमात ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी ग्रामविकास भवनसह विविध योजनांची माहिती दिली. या वेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)