शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

ग्रामपंचायतींना हवीय मुंबईत जागा !

By admin | Published: November 14, 2015 3:39 AM

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सरकारी कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेल किंवा इतरत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो

जगदीश कोष्टी,  साताराग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सरकारी कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेल किंवा इतरत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो. मुंबईत प्रत्येक ग्रामपंचायतीला हक्काची जागा मिळावी, यासाठी वाई तालुक्यातील ‘यशवंत आवास विकास मंडळी’ संस्थेच्या पुढाकारातून राज्यातील ७,३०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून मुंबईला पाठविले आहेत.शेतकऱ्यांपासून विविध घटकांना कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र मुक्काम करण्याची वेळ आलीच तर काय करायचे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्याची सोडवणूक करण्यासाठी यशवंत संस्थेची स्थापना झाली. राज्यातील ३५८ तालुक्यांतील २७ हजार ९०३ ग्रामपंचायती व ४४ हजार ७०० महसुली गावांशी संस्थेने पत्रांद्वारे संपर्क साधला. त्यासाठी संस्थेचे विजय यादव यांनी ४ लाख रुपये खर्च केले. विशेष म्हणजे पत्र मिळाल्यानंतर मुंबईत सुमारे दीड हजार फुटांचे मोफत घर मिळावे म्हणून ७,३०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव केले, तसेच हक्काच्या घरासाठी वाई तालुक्यातील वेळे येथील ‘यशवंत आवास विकास मंडळी’ संस्थेला अधिकारही दिले आहेत.