शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

मुख्यमंत्र्यांचे ग्राम मिशन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2017 4:59 AM

उद्योगपती रतन टाटा, महानायक अमिताभ बच्चन आणि काही नामवंत उद्योगपतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेऊन जाहीर केलेल्या ग्राम संपूर्ण परिवर्तन मिशनची चार महिने

यदु जोशी, मुंबईउद्योगपती रतन टाटा, महानायक अमिताभ बच्चन आणि काही नामवंत उद्योगपतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेऊन जाहीर केलेल्या ग्राम संपूर्ण परिवर्तन मिशनची चार महिने उलटले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. एक हजार गावांच्या विकासाची योजना वाऱ्यावर सोडल्यात जमा आहे.कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून एक हजार गावांचा आमूलाग्र विकास करण्यासाठीचे हे मिशन, २५ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केली होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मिशन कौन्सिलची स्थापना करण्यात येणार होती, ती अद्याप झालेली नाही. सरकार आणि खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली कंपनी स्थापन करण्यात येणार होती, तीदेखील झालेली नाही. मिशनची अंमलबजावणी ग्रामविकास विभागामार्फत केली जाणार आहे. या मिशनच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मिशन कौन्सिलची स्थापना करण्यात येणार होती. त्याचाही मसुदा ग्रामविकास विभागाकडे महिनाभरापासून पडलेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या योजनेमध्ये आधी एक हजार खेडी घेण्यात येणार होती. मात्र, विविध कंपन्यांकडून तब्बल १५०० गावांच्या विकासाचे प्रस्ताव आले. २५ आॅगस्टच्या पहिल्या बैठकीत बडे उद्योगपतीच आलेले होते. त्यानंतर अनेक कंपन्या, बँकांनी मिशनमध्ये सहभागाची तयारी दर्शविल्याने, एक हजार गावांची यादी दीड हजारावर गेली. मात्र, ग्रामविकास विभागातील विशिष्ट अधिकारी पहिल्या टप्प्यात एक हजारच खेडी घेणार यावर अडून बसले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अतिरिक्त पाचशे गावांचा विकास पहिल्या टप्प्यात होण्याबाबत साशंकता आहे, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा मिशनला फटका बसू शकतो. ग्रामविकासाचे हे मिशन आधी १०० गावांमध्ये २ आॅक्टोबरपासून सुरू होईल असेही जाहीर केले होते. तथापि, तेदेखील झालेले नाही. ग्रामविकास विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने, मुख्यमंत्र्यांच्या मिशनला पंकजा मुंडे यांचे खाते कोलदांडा घालत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. यासाठी पन्नास टक्के निधी हा राज्य शासन देईल, असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, तशी तरतूद करण्यात नाही. मिशनच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावात एक तरुण/तरुणीला मानधनावर नेमण्यासाठी अर्ज मागविले आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मुलाखती घेऊन निवड होणार आहे.