शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

ग्रेटा पॉवर प्लँटमध्ये कोळशाऐवजी टायरची भुकटी

By admin | Published: September 28, 2015 2:40 AM

मूल तालुक्यातील मरेगाव येथील ग्रेटा पॉवर प्लँटमध्ये वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाएवजी टायरच्या भुकटीचा वापर केला जात आहे.

चंद्रपूर : मूल तालुक्यातील मरेगाव येथील ग्रेटा पॉवर प्लँटमध्ये वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाएवजी टायरच्या भुकटीचा वापर केला जात आहे. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर राख पसरली असून वातावरण प्रदूषित होत असल्याचा आरोप विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी केली आहे.नागरिकांकडून तक्रारी आल्याने या ठिकाणची पाहणी केल्यावर फडणवीस यांनी रविवारी सकाळी चंद्रपुरात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.मूल परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरत असूनही प्रदूषण नियंत्रण विभाग कसलीही दखल घ्यायला तयार नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आपण या परिसरात प्रत्यक्ष भेट दिली असता, प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर टायरच्या भुकटीच्या पोत्यांचा साठा ठेवलेला आढळला. हा साठा कोळशाऐवजी वापरला जात आहे.हा प्रकार कुणाच्याही लक्षात येऊ नये, याची खबरदारी व्यवस्थापन घेत आहे. टायरच्या भुकटीचा वापर केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरले असून डोळे चुरचुरणे, श्वसनाचे विकार वाढले आहेत. परिसरात नेहमी काळा धुर पसरलेला असतो. प्लँटमधून निघणारी राख नहरात सोडली जात असून ते पाणी शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे पाणीही प्रदूषित झाले आहे. दुसरा नहर जिल्हा परिषदेच्या मामा तलावाला जोडला असून दूषित पाणी तलावात पोहोचत आहे. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)