शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

पावसाळ्यातच खालावली भूजल पातळी

By admin | Published: August 11, 2014 12:48 AM

हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात

दुष्काळाची चाहूल : वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊसज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात वाढणारी भूजल पातळी यंदा मात्र घटत असल्याचे दिसत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील आठ तालुक्यांंची भूजल पातळी ०.६८ ते ०.१६ मीटरने खालावली आहे. यवतमाळ हा हमखास पावसाचा जिल्हा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ५१२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा पावसाने जिल्ह्यावर अवकृपा केली आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ३०३.०२ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.३० टक्के आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या दीडशे टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मे महिन्यात १.७५ मीटर भूजल पातळी होती. परंतु आता ही पातळी खालावत असल्याचे दिसून येते. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मे महिन्यात भूजल पातळी तपासण्यात येते. मात्र यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शासनाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, महागाव, पुसद, उमरखेड, दारव्हा आणि बाभूळगाव या तालुक्यात भूजल पातळी खालावल्याचे दिसून येते. दारव्हा तालुक्यात सर्वाधिक ०.६८ मीटरने पातळी खालावली आहे. तर महागाव ०.४१, पुसद ०.३६ मीटर अशी पातळी खालावली आहे. विशेष हे कीे, या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ २५ टक्के पाऊस झाला. त्यामुळेच भूगर्भातील पाण्याची पातळीच वाढली नाही. जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया दिसत आहे. अद्यापही तालुक्यातील पैनगंगा, पूस, वर्धा, अडाण या नद्यांचे पात्र कोरडे आहे.