शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

सामूहिक विवाह सोहळे गावागावांत व्हावेत

By admin | Published: April 17, 2016 1:45 AM

हुंडा प्रथा बंद होण्यासाठी आणि पाण्याच्या बचतीसाठी गावागावांत सामूहिक विवाह सोहळे झाले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी शिवसेनेतर्फे

औरंगाबाद : हुंडा प्रथा बंद होण्यासाठी आणि पाण्याच्या बचतीसाठी गावागावांत सामूहिक विवाह सोहळे झाले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी शिवसेनेतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत अयोध्यानगरीच्या मैदानावर औरंगाबाद जिल्ह्यातील हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय २४५ जोडप्यांचा भव्य विवाह सोहळा हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पालकमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. चंद्रकांत खैरे, खा. राजकुमार धूत उपस्थित होते. यावेळी राज्यपाल म्हणाले की, सामूहिक विवाह हा चांगलाउपक्रम आहे. यामुळे पैशाची बचत होते. मराठवाड्यात पाणी स्थिती गंभीर असल्यामुळे अशा विवाह सोहळ्यामुळे पाण्याचीही बचत होणार आहे. विविध जातीसमूहातील विवाह सोहळे आयोजित झाल्यास समाजात एकोपानिर्माण होईल. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सर्व गावागावांत असे उपक्रम व्हावेत. मराठवाड्यासह राज्यात कठीण परिस्थिती आहे. दुष्काळामध्ये नद्या, विहिरी, तलाव आटले आहेत. मात्र, शिवसेनेतील माणुसकीचा झरा कधीही आटणार नाही. आम्ही माणसं जोडतो. अडीअडचणीमध्ये असलेल्या कोणत्याही समाज किंवा धर्माच्या व्यक्तीला मदत करणे हेच आमचे हिंदुत्व असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या विवाह सोहळ्याचे संयोजक असलेले खा. चंद्रकांत खैरे यांनी केले. यापुढे जालना, बीड आणि उस्मानाबाद येथेही अशा स्वरुपाचे विवाह सोहळे होतील, असे ते म्हणाले. यावेळी ८ मुस्लिम, ४२ बौद्ध आणि १९५ हिंदू जोडप्यांचा विवाह थाटात पार पडला. यासाठी भव्य असे स्टेज आणि मंडप उभारण्यात आले होते. प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजानुसार ही लग्ने लावण्यात आली. (प्रतिनिधी)धूत यांच्यातर्फे २० टँकरखा. राजकुमार धूत यांच्यातर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेतर्फे पाण्याचे २० टँकर देण्यात आले. या टँकरचे लोकार्पण राज्यपालांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख तसेच इतर कार्यकर्त्यांकडे टँकरच्या चाव्या देऊन करण्यात आले. अयोध्यानगरीच्या मैदानावरच हे सर्व टँकर उभे करण्यात आले होते.