शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

आरटीईच्या अर्ध्या जागा रिक्त

By admin | Published: May 23, 2017 5:38 AM

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवर राज्यभरातील शाळांमध्ये अद्याप ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये चार ते पाच फेऱ्या पूर्ण होऊनही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवर राज्यभरातील शाळांमध्ये अद्याप ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये चार ते पाच फेऱ्या पूर्ण होऊनही तब्बल ६२ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. ग्रामीण भागात मिळालेला अत्यल्प प्रतिसाद आणि पालकांकडून ठराविक शाळांना असलेल्या मागणीमुळे प्रवेश कमी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात सर्वाधिक सुमारे १० हजार प्रवेश एकट्या पुणे जिल्ह्यात झाले आहेत.राज्यात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी एकूण ८ हजार २७८ शाळांमध्ये १ लाख २० हजार ५४३ जागा उपलब्ध आहेत. यंदा या जागांवर प्रवेशासाठी राज्यात पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यांत आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशासाठी १ लाख ४४ हजार ८५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमधून संगणकाद्वारेच लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत पाच लॉटरी फेऱ्या झाल्या आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही आतापर्यंत चार किंवा पाच फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ ५८ हजार ८ प्रवेश झाल्याचे शिक्षण विभागाच्या आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.राज्यात अद्याप ५० टक्केही प्रवेश पूर्ण झाले नसून तब्बल ६२ हजार ५३५ जागा रविवारअखेरपर्यंत रिक्त राहिल्या आहेत. एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे ५८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल,े तरी अनेक विद्यार्थ्यांची काही शाळांमध्ये निवड होऊनही त्यांनी प्रवेश घेतला नाही. काही विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रवेश मिळालेला नाही. तर अनेक पालकांनी अर्ज करताना ठराविक शाळेलाच पसंती दिल्याचे दिसते. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश पूर्ण झाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच ग्रामीण भागात अद्यापही आरटीई प्रवेशाबाबत तेवढी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे प्रवेश क्षमतेपेक्षा जादा अर्ज येऊनही रिक्त जागांची संख्या अधिक आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.यंदा अधिक प्रवेश मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईच्या प्रवेशामध्ये वाढ झाली आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यात सर्वत्र आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात असल्याने सोपी झाली आहे. शहरी भागांतील पालकांना याबाबत पुरेशी माहिती झाली झाली आहे. मागील वर्षी यंदाच्या तुलनेत ४० ते ४५ टक्केच प्रवेश झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिकचे प्रभारी शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी आरटाईची प्रक्रिया अद्याप सुरू असून शंभर टक्के प्रवेश होतील, असा दावा केला आहे.पुणे जिल्हा आघाडीवरराज्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार ९७१ प्रवेश झाले आहेत. जिल्ह्यात सुमारे १५ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी तब्बल ३६ हजार ९३३ अर्ज आले असून त्यातही पुणे आघाडीवर आहे. तर, राज्यात सर्वाधिक १६ हजार ४५६ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात केवळ ४ हजार ३६२ प्रवेश झाले आहेत. पुण्यापाठोपाठ नागपूर, ठाणे, नाशिक आणि मुंबई यांचा क्रमांक लागतो.