शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हँड्स अप ! 'अब तुम्हारा खेल खत्म', छे... पिक्चर अभी बाकी है, महाराष्ट्रजनहो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 18:12 IST

1978 साली खंजीर खुपसणे ही म्हण महाराष्ट्रात गाजली होती. शरद पवारांनी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादांच्या पाठिंत खंजीर खुपसला. तोही यशवंतराव चव्हाण यांच्या संमतीने खुपसला गेला अशी चर्चा तेव्हा रंगली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी जी भूमिका वठवली तिच भूमिका आज शरद पवार वठवताना दिसत आहेत.

- राजा मानेमुंबई- हँडसअप! 'अब तुम्हारा खेल खत्तम हो चुका है'..जुन्या सस्पेन्स सिनेमाच्या क्लायमॅक्सला हे अस्सच घडायचं...महाराष्ट्राच्या राजकारणातही अगदी तस्संच घडतंय ना..संपलं, संपलं म्हणत असतानाच...कुणीतरी अचानक टपकतो अन् हँडसअप म्हणतो...पुन्हा खेळ चालूच..कारण पिक्चर अभी बाकी है महाराष्ट्रजनहो!

'हँड्स अप अब तुम्हारा खेल खत्म', हा डायलॉग 1970 च्या काळातील चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये हमखास असायचा. चित्रपटाचा शेवट होणार असं वाटत असताना अचानक विलन येणार अन् डोक्याला बंदूक लावून 'हँड्स अप' म्हणत. त्यानंतर आपला मेंदू शांत होईपर्यंत 'हँड्सअप'चा खेळ चालायचा. या मधल्या काळात नट-नट्या आणि हास्यअभिनेते आपल्या माकडचाळ्यांनी क्लायमॅक्सची मारामारी रंगतदार करायचे. असंच काहीसं महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असल्याचे दिसून येते. 

पूर्वीच्या काळी सस्पेन्स असलेले चित्रपट यायचे. या चित्रपटांमध्ये एखादी डायरी दाखवण्यात यायची. त्या डायरीचा शोध घेण्यावर चित्रपटाची कथा पुढे सरकत जायची. अगदी त्याच डायरीचं स्वरुप आता महाराष्ट्राच्या राजकारणाला आले आहे. ती डायरी म्हणजे महाराष्ट्राच्या विधीमंडळातील संख्याबळ होय. ही डायरी कधी शिवसेना नेते संजय राऊत तर कधी शरद पवार यांच्या हाती लागत केली. आता मध्येच ही डायरी फडणवीसांकडे गेली. या फेकाफेकीत सर्वाधिक काळ डायरी राऊत यांच्याच हातात होती. मात्र कितीही हातचालाखी केली तरी, अखेर ती डायरी शरद पवार यांच्याच हाती लागायची. या डायरीची अवस्था चित्रपटाप्रमाणेच झाली आहे. 

महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुरू होईल. परंतु, कथेत फडणवीस आणि अजित पवार यांनी सर्वात रंजक ट्विस्ट आणलं. हे दोघेच या कथेचे सुत्रधार आहेत की, पडद्यामागे आणखी कोणी आहे, हे कळायला मार्ग नाही. यातही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, अजितदादांना शरद पवारांची मुकसंमती तर नव्हे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी येतो तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय मुल्य उरलं का, विचारधारेला, वैधानिक आणि कायद्याच्या चौकटीत महाराष्ट्राचे राजकारण कुठं बसवायचं आणि राज्याच्या राजकारणात शरद पवार, पवार कुटुंबांची भूमिका नक्की काय आहे याभोवती महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती फिरतोय. जुन्या सिनेमात ट्विस्ट येण्यापूर्वी हे घडणार अस वाटत असताना वेगळच काही घडायचं. आज नेमक तेच होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल ही मंडळी रात्रीतून कृती करते, तेव्हा ते कायद्याच्या कसोटीत बसणारीच कृती करतील यात शंका नाही. किंबहुना अजित पवार सारखा नेता आपलं राजकीय भवितव्य एका रात्रीत कसकाय पणाला लावू शकतो, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व घडामोडीचा निष्कर्ष आपण काढल्यास हेच लक्षात येतं की, राज्याची डायरी पूर्वीपासूनच लिहिली गेली आहे. या डायरीसाठी प्रसंगानुसार जो येईल तो म्हणतो, 'हँड्स अप अब तुम्हारा खेल खत्म', परंतु, तो खेळ संपलेला नसतो. तो खेल तेथूनच सुरू होतो, अशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात आपण अनुभवत आहे. 

1978 साली खंजीर खुपसणे ही म्हण महाराष्ट्रात गाजली होती. शरद पवारांनी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादांच्या पाठिंत खंजीर खुपसला. तोही यशवंतराव चव्हाण यांच्या संमतीने खुपसला गेला अशी चर्चा तेव्हा रंगली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी जी भूमिका वठवली तिच भूमिका आज शरद पवार वठवताना दिसत आहेत. शरद पवार आणि माझा काही संबंध नाही, अशी भूमिका यशवंतरावजींनी घेतली होती. अगदी तिच भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. तेही म्हणतात अजित पवार आणि माझा काहीही संबंध नाही. मात्र मुकसंमतीशिवाय किंवा कुठलाही ठोस आधार असल्याशिवाय, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा संघ परिवार अस धाडस करू शकेल का, असा प्रश्न सहाजिकच तुमच्या माझ्या मनात आहे. त्या प्रश्नाचे उत्तर 'ये खेल अब कब खत्म होगा', असं म्हणतच आपल्याला थांबवं लागेल.