शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

हरलो तर राजकारण सोडेन : आर.आर.

By admin | Published: August 11, 2014 10:24 PM

निर्धार मेळावा : नाही तर संजय पाटलांनी खासदारकी सोडावी

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात कोणाला उभे करायचे असेल त्याला करा. विक्रमी मताधिक्याने माझा विजय झाला नाही, तर मी कायमचे राजकारण सोडून देईन आणि जर विजयी झालो, तर संजय पाटलांनी अपघाताने व लाटेवर मिळालेली खासदारकी सोडावी, असे आव्हान आज (सोमवारी) गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात दिले. सांगलीच्या पोलीस मुख्यालय परिसरातील सभागृहात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा झाला. यावेळी आर. आर. पाटील यांनी खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या व वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे काही नेते वाऱ्याबरोबर पाठ फिरवत आहेत. काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काहीजण गेल्यात जमा आहेत, तर काहींनी नुसत्याच गाठीभेटी केल्या आहेत. या सर्वांना माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर निघून जावे. अशा कोणत्याही नेत्याबरोबर चर्चा करण्याची आमची तयारी नाही. ज्यांचा निष्ठेशी, विचारांशी संबंध नाही, असे लोक पक्षातून गेल्याने काहीच फरक पडणार नाही. तालुकास्तरावर काम करणाऱ्या अनेक नेत्यांना दिवसा आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. अशा नेत्यांच्या पक्षप्रवेशाला आणि त्यांना समावून घेणाऱ्या महायुतीला आमच्या शुभेच्छा आहेत. इतके दिवस आम्ही त्यांना सहन केले, आता महायुतीने त्यांचा अनुभव घेऊन पहावा. आम्ही जे सोसले आहे, ते त्यांना कितपत सोसणार, हासुद्धा प्रश्न आहे. त्या-त्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हीच संधी मानली पाहिजे. आम्ही नेत्यांच्या जागी उसना उमेदवार आणण्याऐवजी कार्यकर्त्यांनाच नेते बनवू. त्यामुळे अशा नेत्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नाही. धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी जतमधील प्रकाश शेंडगेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना आमदारकी मिळाली, पण धनगर समाजाला काय मिळाले, याचा विचार समाजाने करावा. (प्रतिनिधी)देवेंद्र फडणवीसांचे दिवास्वप्नकेंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर आता राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचे दिवास्वप्न पडत आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांची परंपरा आणि पुण्याई अजून संपलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा न करणाऱ्या पक्षाची व कोत्या मनोवृत्तीच्या लोकांची सत्ता येथे येऊ शकत नाही, अशी टीका गृहमंत्री पाटील यांनी केली. ...तर राष्ट्रवादीचे शेट्टींच्या घरावर मोर्चेकेंद्रात आघाडी सरकार असताना शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ झाली नाही, म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलने केली. आता महायुतीच्या शासनाने शेतीमालाच्या आधारभूत किमतीबाबत आघाडीपेक्षाही वाईट भूमिका घेतली आहे, तरी शेट्टी गप्प आहेत. त्यांची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे की महायुतीशी?, असा सवाल गृहमंत्री पाटील यांनी उपस्थित केला. शेतीमालाविषयी आता केंद्र शासनाची अशीच नियत राहिली, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेट्टी व स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांच्या घरावर मोर्चे काढतील, असा इशाराही त्यांनी दिला.