शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
5
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
6
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
7
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
8
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
9
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
10
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
11
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
12
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
13
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
14
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
15
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
16
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
17
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
18
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
19
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
20
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेत त्यांनी..; दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 2:08 PM

बाळासाहेबांच्या विचारांचे पालन करणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत असं केसरकरांनी म्हटलं.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही सर्व सहकारी बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन चाललो आहोत. दसरा मेळावा आणि बाळासाहेब हे वेगळं करता येत नाही. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाच्या भूमिकेपासून आम्ही फारकत घेतली नाही. दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरु केलेली परंपरा आहे. वाद निर्माण करण्याचा कुठलाही उद्देश नाही. जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी दूर गेलेत त्यांनी काय करावं? कुणाची युती करावी न करावी हा विचार त्यांनी करावा असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांचे पालन करणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत. बाळासाहेब हिंदुत्वापासून कधीही लांब गेले नसते. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली नसती. हेच राज्यात घडलं. त्यालाच बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जाणे म्हणतात. आम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेब यांच्या विचारांशी दूर गेलो नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच दसरा मेळावा घ्यावा की घेऊ नये याबाबत कुठलीही चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नाही. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा, मग त्याचठिकाणी मेळावा घ्यावा असं नाही. दुसरीकडेही घेऊ शकतात. परंतु अद्याप या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही. जेव्हा हा विषय असेल तेव्हा मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. छत्रपती शिवाजी महाराज पार्क याठिकाणी हायकोर्टाचे अनेक निर्बंध आहेत. त्याठिकाणी कुणाला परवानगी द्यावी याबाबत चर्चा होईल. यावर कुठलाही पक्षपाती निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार नाहीत. कुणाबाबत दुजाभाव होणार नाही. मुंबईत विविध मैदाने आहेत. विचारधारा महत्त्वाची आहे, मैदान नाही. दसरा मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी येणार नाहीत कारण त्यांची विचारधारा हिंदुत्ववादी विरोधात आहे असंही केसरकरांनी स्पष्ट केले. 

बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदे एकनिष्ठ शिवसेना ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत शिवसेनेचं रोपटं बाळासाहेबांनी लावले. त्याचे वृक्षात रुपांतर झाले आहे. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत. महाराष्ट्राला बाळासाहेबांच्या स्वप्नातील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे लाभले आहेत. बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदे एकनिष्ठ आहेत असंही दीपक केसरकरांनी सांगितले. 

भरत गोगावले चुकले, दीपक केसरकरांचा खुलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली समज

खोके संस्कृती काँग्रेस-राष्ट्रवादीची खोके संस्कृती महाराष्ट्रात कुणी आणली हे जनतेला माहिती आहे. ही संस्कृती काँग्रेस-राष्ट्रवादीने आणली. आम्हाला त्याबाबत देणंघेणं नाही. ५० खोके म्हणजे ५० कोटी. जर आम्ही ५० हजार घेतल्याचं सिद्ध झाले तर राजीनामा देईन. सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल. चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात त्यांना फेस करावं लागलं. ग्लोबल्स निती विरोधकांकडून खेळली जाते. वारंवार खोटं सांगून ते सत्य मानलं जाते. १०० वेळा खोटे बोलले तर ते लोकांना खरे वाटते. ही निती महाराष्ट्रात चालणार नाही असंही दीपक केसरकरांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना