शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

जातीच्या नावावर डोकी फुटताहेत- राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 2:01 AM

लहान मुलेही जातीविषयक बोलू लागली, महाराष्ट्राला प्रबोधनाची गरज; राज ठाकरे यांची खंत

पुणे : ‘लहान मुले आता आपआपसांत जातीविषयक गोष्टी बोलु लागली आहेत. आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला प्रबोधनाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सैनिकांत सर्व जातीची माणसे होती. त्याच स्वराज्यात आता जातीच्या नावावर एकमेकांची डोकी फोडली जात आहेत, अशी खंत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.मनसेच्या मेळाव्यात शुक्रवारी बोलताना पुढील काळात महाराष्ट्राचा बिहार, उत्तरप्रदेश की झारखंड करणार असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. सध्या जातीय वातावरणात ढवळुन निघालेल्या सामाजिक वास्तवाकडे राज यांनी लक्ष वेधले.भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी हा काही गुरुपौर्णिमेचा मेळावा नसल्याचे स्पष्ट केले. आपल्याला रस्त्यावर जे काही होर्डिंग दिसले तेव्हा स्वत:लाच आपण जात असलेला मेळावा गुरुपौर्णिमेनिमित्त आहे, असे कळले. अशी मिश्किल टिप्पणीत्यांनी केली. यावेळी व्यासपीठावर आमदार शरद सोनवणे, अनिल शिदोरे, संदीप देशपांडे, नगरसेवक वसंत मोरे, गजानन बाबर, रणजित शिरोळे, रुपाली ठोंबरे पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.प्रत्येकाने धर्म घरात सांभाळावा...मुस्लिम समाजाला अजानकरिता लाऊडस्पीकरची काय गरज आहे? त्यांना लाऊडस्पीकर लावून कुणाला कळवायचे आहे, नमाज पढण्याकरिता पूर्ण रस्ते अडविण्याची काय गरज आहे, नमाज पढायचा आहे तो ज्याने त्याने आपल्या घरी पढावा. प्रत्येकाने आपआपला धर्म घरात सांभाळावा. उगाचच दुसºयाने तिसºयाला सांगायला जाऊ नये. या शब्दांत धर्माच्या नावाने राजकारण करणाºयांना फटकारले.चार वर्षांनंतर राम मंदिर आज आठवले का?४ वर्षात तुम्हाला आज राम मंदिर आठवले का? असा सवाल ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्चितपणे बांधले गेले पाहिजे पण निवडणुका झाल्यावर, असे माझे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा भाजपाने पुन्हा समोर आणला आहे, अशी टीका त्यांनी केली.त्या कापडाचे काय झाले?राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते असताना सभागृहाबाहेर गळयात एक कापड लटकवून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी घोषणा देत असत. आता तर सत्तेत असताना देखील आरक्षण मिळत नाही. तेव्हा गळ्यातील त्या कापडाचे काय झाले? अशी टीका राज यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरटीका केली.राहूल गांधींच्या मिठीने काय फरक पडणार होता?काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतल्यानंतर झालेल्या चर्चेवर बोलताना राहुल गांधींच्या मिठीने काय फरक पडणार होता असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. नरेंद्र मोदी देशविदेशात इतक्या जणांना मिठ्या मारतात असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण