शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

नियोजित महापालिकेची सुनावणी

By admin | Published: July 18, 2016 3:06 AM

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली.

पनवेल : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली. जनसुनावणीवेळी आपल्या हरकती व तक्रारी नोंदविलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणी पार पडली. महानगरपालिकेत समाविष्ट भागाचा वेध घेतल्यास अनेकांनी पनवेल महानगरपालिकेला हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र खारघर शहरातून पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यास तीव्र विरोध दर्शविण्यास येत असल्याचे याठिकाणी स्पष्ट झाले आहे. पनवेल नगरपरिषद हद्दीसह शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा यामध्ये समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात ५ लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. जनसुनावणी वेळी ६८ गावांपैकी बहुतांशी गावांनी महानगरपालिकेत समाविष्ट होण्यास तयारी दर्शविली. खारघर, तळोजामधील शेकडो रहिवासी, लोकप्रतिनिधी याठिकाणी उपस्थित होते. खारघरसाठी स्वतंत्र महानगरपालिका असावी असा सूर या जनसुनावणीच्या वेळी उमटताना दिसला. भाजपा, सेना महानगरपालिकेच्या बाजूने असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. नागरिकांच्या हरकती व सूचनांचा अभ्यास करून अहवाल तयार केला जाईल, त्यानंतर तो अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे. खारघरमधील नागरिकांनी याठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा हवाला देत सद्य:स्थितीत खारघरचा महानगरपालिकेत समावेश करू नये, अशी विनंती केली. नियोजित पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगाने चार हजारांच्या आसपास सूचना व हरकती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. नियोजित महानगरपालिका परिसर व शहरामधून सर्वात जास्त सूचना व हरकती खारघर शहर व परिसरातून आलेल्या आहेत त्याची प्रचिती जमलेले विविध पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीवरून दिसून आली. पनवेल नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवस नागरिकांमध्ये संभ्रम होता. हरकतींवर व सूचनांवरील सुनावणी आता देखील पार पडली असून लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. >लवकरच चित्र स्पष्ट होणार!पनवेल नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवस नागरिकांमध्ये संभ्रम होता.हरकतींवर व सूचनांवरील सुनावणी आता पार पडली आहे. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.