शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

महाराष्ट्रात पुन्हा आली उष्णतेची लाट

By admin | Published: April 15, 2017 4:16 AM

गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून, शुक्रवारी राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याने काहिली वाढली आहे.

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून, शुक्रवारी राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याने काहिली वाढली आहे. वर्ध्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.सौराष्ट्र, कच्छ भागात उष्णतेची लाट कायम असून, तेथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढले आहे़ गुजरात, पश्चिम राजस्थान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल २२ शहरांचे कमाल तापमान ४० अंशावर नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंशावर स्थिर असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. मुंबईत उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून, आर्द्रतेमध्येही वाढ होत आहे. (प्रतिनिधी)रात्रीचे पुणे सर्वांत थंड : महाबळेश्वरचे आजचे तापमान ३५.१ अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा तापमानात ३ अंशाने वाढ झाली आहे. महाबळेश्वरचे किमान तापमानही २१.६ इतके आहे. त्याच्यापेक्षा पुण्याचे किमान तापमान कमी असून ते १८.८ अंश सेल्सिअस आहे. पुण्यात सध्या रात्री राज्यातील सर्वांत कमी तापमान आहे. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान : औरंगाबाद ४१.१, नाशिक ४०.९, परभणी ४३.१, पुणे ४०.१, सांगली ४०.४, सातारा ४०.१, सोलापूर ४२.२, अकोला ४४.१, अमरावती ४१.६, बुलडाणा ४०.६, चंद्रपूर ४२.६, गोंदिया ४२.६, नागपूर ४२.८, वाशिम ४०.८, वर्धा ४३.५, यवतमाळ ४२.५, अहमदनगर ४३.२, जळगाव ४३.२, मालेगाव ४३.२, नांदेड ४३, उस्मानाबाद ४१.३, बीड ४१.६