शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

जळगावात शेतक-याचा उष्माघाताने मृत्यू

By admin | Published: April 06, 2017 12:26 PM

राजेंद्र भिरूड या शेतक-याचा बुधवारी संध्याकाळी उष्माघातानं मृत्यू झाला. ते पाडसळे येथील रहिवासी होते.

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 6 - राजेंद्र भिरूड या शेतक-याचा बुधवारी संध्याकाळी उष्माघातानं मृत्यू झाला. ते पाडसळे येथील रहिवासी होते. दरम्यान, उष्माघाताचा हा जिल्ह्यातला दुसरा बळी आहे. मूळचे शिरसाड येथील रहिवासी असलेले भिरूड हे गेल्या 20वर्षांपासून व्यवसायानिमित्त पाडळसे, तायावल येथे स्थायिक झाले होते.
 
बुधवारी दुपारी ते शेतात कडब्याचा चारा बांधत असताना त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला. यानंतर संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पाडळसे येथील स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आलं. या डॉक्टरांनी त्यांना तातडीने भुसावळ येथे हलवण्याची सूचना केली.
 
दरम्यान, भुसावळ येथे नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळेच शेतक-याचा मृत्यू झाला असे  वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. गुरुवारी सकाळी मूळ गावी शिरसाड येथे भिरुडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
आणखी बातम्या