शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

अरे, उठाऽऽ उठाऽऽ दिवाळी आली..!

By admin | Published: October 20, 2014 10:18 PM

सरकारनामा

श्रीनिवास नागेधडाऽऽड धूऽऽम : औट, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी तोटे-चिमणी तोटे, भुईनळे, बाण, लवंगी फटाके उडू लागले!दारावर टकटक झाली आणि ‘उठा उठाऽऽ दिवाळी आली, अभ्यंगस्नानाची वेळ झाली!’ अशी हाक ऐकू आली. संजयकाकांना हे नवीनच होतं. अभ्यंगस्नान (कुठनं काढलाय राव हा शब्द? म्हणताना जिभेचे तुकडे पडताहेत!) ही काय भानगड, बघूया तरी, म्हणून ते उठलेच. (हल्ली संघवाल्यांच्या संगतीनं काय-काय करायला लागतंय, नाही?) बघतात तो समोर ‘कमळ’ छाप उटणं आलं. सोबत नरेंद्रभाई-अमितभाई कंपनीचा सुवासिक साबण. गुलालानं माखलेल्या काकांनी उटणं लावलं. खसाखसा साबण लावून कढत पाण्यानं आंघोळ (नव्हे अभ्यंगस्नान...) केली. जगतापसाहेब, सुधीरदादा, खाडे यांनी पाण्याच्या घंगाळाखाली जाळ लावला होता. (नाईकसाहेब मात्र राजूभार्इंना ‘नाग’ छाप तेल देत होते. ते काकांकडं फिरकलेही नाहीत म्हणे!)काकांनी कुर्ता चढवला, तोच कानठळ्या बसवणारा आवाज झाला. ‘कोण रे त्यो?’ असं विचारत काका पुढं आले, पण तिथंच थिजले. आबांनी कवठेएकंदचे औट लावायला सुरुवात केली होती. त्या आवाजानं कानाला दडे गेल्यानं घोरपडे सरकारांनी कधीचाच पळ काढला होता. ‘काका, मला वाचवाऽऽ’ म्हणायलाही त्यांना वेळ मिळाला नाही!! आबांची दिवाळी बघून ‘आता पाच वर्षं परत ह्येचं औट ऐकायचं... ह्यो तेवढा पडायला पाह्यजे होता रे...’ असं म्हणत काकांनी बसकण मारली. तेवढ्यात ‘सण्णऽऽऽ’ करत कानाजवळून बाण गेला. अनिलभाऊंनी एका हातात धनुष्यबाण घेऊन दुसऱ्या हातातनं सोडलेले रॉकेट बाण, भुईनळे पार खानापुरातनं तासगावपर्यंत फिरत होते. काकांनी निरखून बघितलं, भाऊंनी बाण उडवण्यासाठी ‘अंजनी मेड बॉटल’ वापरली होती. कोपऱ्यात उभं राहून सुभाषआप्पा फुगे फोडत होते. त्या फुग्यांचा आवाजही फटाक्यांच्या माळांसारखा येत होता. अनिलभाऊंचे बाण टोपी आणि गोपी यांच्या गोटात घुसत होते. गोपीकडं दिलेल्या कमळाच्या पार चिंध्या झाल्या होत्या. टोपीही काळवंडली होती.तिकडं कदमसाहेबांचे सुतळी बॉम्ब पलूस-कडेगावमध्ये फुटत होते, पण त्यांचा आवाज जिल्हाभर घुमत होता. टेंभूचे फुसके बार घेऊन पृथ्वीराजबाबा कमळाच्या तलावाभोवती फिरत होते. शेवटी सगळे बार फुसके निघाल्यानं त्यांनी ते तलावात टाकून दिले.‘आता आम्हीबी दाखवतो,’ असं म्हणत काकांनी इशारा केला. त्यावर जगतापसाहेबांनी तोटे लावले. धडाऽऽड धूऽऽम... या तोट्यांचा आवाज तासगाव आणि पलूस-कडेगावपर्यंत गेला. तो ऐकताच कदमसाहेबांनी पाहुण्यांकडच्या सावंतांच्या पोराला गावाकडं जायला सांगितलं. आबा मात्र शेंडग्यांच्या प्रकाशअण्णांना हुडकत होते. प्रकाशअण्णांनी केव्हाच मुंबईची गोदी गाठली होती. पुन्हा कधीही जतला यायचं नाही, असं ठरवून!दिवाळीत असा रंग चढत असताना इस्लामपूरकर कसे मागे राहतील! त्यांनी पंच्याहत्तर हजाराची माळच लावली. त्या फटक्यांनी ‘एकास एक’ म्हणणाऱ्यांची पळता भुई थोडी झाली! प्रतीकदादा तर गायबच झाले, पण राजूभाई आणि सदाभाऊही उसाच्या फडात लपून बसले. अभिजितआबा आणि जितेंदरला इस्लामपूरकरांनी पळवून लावलं होतं. जितेंदरनं मनोमन ठरवलं की, बोरगाववरनं हायवेकडं जाताना इस्लामपूर ओलांडायचं नाही... आणि अभिजितआबांनी निश्चय केला की, चिकुर्डेकडनं वाळव्यात जाताना इस्लामपूरमार्गे न जाता येलूर, कामेरीमार्गे रानातनं जायचं! महाडिक कंपनीनं मात्र हुशारीनं इस्लामपूर सोडून शिराळ्याचा रस्ता धरला. तिथं नाईकसाहेब ‘झाड’, ‘भुईनळे’ लावत होते. लख्खं प्रकाशानं सगळं उजळून निघत होतं. महाडिक कंपनीनं फुलबाजे हातात घेऊन फिरवायला सुरुवात केली. दोघा भाऊंच्या (मानसिंग आणि सत्यजित हो!) लवंगी फटाक्यांच्या माळा आधीच विझल्या होत्या. (इस्लामपूरकरांनी कुणाच्या माळांना बत्ती दिली आणि कुणाच्या माळांची वात काढली, हे मात्र दोघा भाऊंना अजून समजलेलं नाही.)खाडेंनी मिरजेत ‘लक्ष्मी’ तोटे, ‘चिमणी’ तोटे लावले होते. तेवढ्या आवाजानंही जाधव मास्तर, सांगलीकर वकील आणि होनमोरे खुर्चीखाली दडून बसले. जाधव मास्तर आणि सांगलीकर वकील अजूनही एकमेकांची कशी जिरवली, या अविर्भावात होते. (त्यांना काय माहीत, की जिरवाजिरवीत आपलीच जिरली ते!) मदनभाऊ सांगलीतल्या बंगल्यात भुईचक्र लावून त्याभोवती स्वत:च गरगर फिरत होते. सगळ्यांनीच असं कसं फिरवलं? इस्लामपूरकरांची ‘गेम’ लक्षात कशी आली नाही? आपल्या पप्पूनं दगा का दिला? तीन नंबरवरचं ‘कमळ’ वर आलंच कसं? हे प्रश्नही त्यांच्या डोक्यात गरगर फिरू लागले. मग त्यांनी आणखी भुईचक्रं लावली. ती बंगल्यातनं बाहेर रस्त्यावर गेली आणि खड्ड्यांमध्ये रूतून बसली. ‘महापालिकेनं रस्त्यांची पार वाट लावलीय...’ असं ते म्हणाले, पण लगेच जीभ चावली. महापालिका तर आपल्याच ताब्यात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.संभाजीआप्पांनी सांगलीच्या मारुती चौकात फटक्यांच्या माळा मागवल्या होत्या. त्यातल्या काही प्रतीकदादांनीच दिल्या होत्या म्हणे! पण सराफकट्ट्यावरनं रंगीबेरंगी भुईनळे आकाशात उडू लागल्याचं दिसताचं आप्पांनी पृथ्वीराजभैय्याला सगळ्या माळा वखारभागात न्यायला लावल्या. पुढच्या वेळी येतील कामाला, असं सांगत त्यांनी पोरांची समजूत घातली.जाता-जाता : सराफकट्ट्यावरनं रंगीबेरंगी भुईनळे आकाशात झेपावू लागले. त्यातल्या काही ‘क्रॅकर्स’मधून वेगवेगळे आवाज येत होते. नेमके काय आवाज येत होते, ते समजलं नाही, पण दिनकरतात्यांना वाटलं की, ‘पेढीवर चला‘, ‘पेढीवर चला’ असा आवाज त्यातनं येतोय! त्यांनी सांगलीवाडीकडनं सराफकट्टा गाठला. गाडगीळांच्या पेढीपुढं चिक्कार गर्दी. ‘सोनं घ्या सोनं... उरलेलं सोनं’ असा बोर्ड पेढीच्या दारात लावला होता. पांढरा सदरा-खाकी चड्डीवाल्यांचा भरणा जास्त होता. तात्या बिरजे, दीपकबाबा, भारतीताई एकेकाला रांगेतनं सोडत होते. नीताताई कट्ट्यावर बसल्या होत्या. ‘माझा क्लेम’... ‘माझा क्लेम’ असं काहीतरी बडबडत होत्या म्हणे! दिनकरतात्या आत घुसले, तोच समोरनं इनामदारांचा शेखर आला. आत एसी केबीनमध्ये बसून सुधीरदादा सगळ्यांना आपट्याची पानं (हेच ते सोनं, बरं का!) देत होते... ‘प्रचाराच्या गडबडीत दसऱ्याचं सोनं द्यायचं राह्यलं. म्हणून आता...’ दिनकरतात्यांच्या लक्षात आलं. ही सगळी इनामदारांच्या शेखरची शाळा! ते मागं फिरले आणि मागच्या दाराला गेले. तिथं दिलीप पैलवानही ‘साथीदारां’ना घेऊन आले होते. दिनकरतात्या आणि पैलवान आत निघाले, तोच इस्लामपूरकरांची गाडी मागच्या बाजूनं बाहेर पडली. गाडीत संजयकाका आणि माधवनगरचे पप्पूशेठही दिसले. दिनकरतात्या आणि पैलवानांनी काय समजायचं ते समजलं. दोघंही आल्या पावली मागं फिरले... आत काही शिल्लक नसणार. हे सोनं इस्लामपूरकरांनी कधीच लुटलं असणार, याची त्यांना पक्की खात्री होती!!

‘त्यांच्या’ केपाही उडाल्या नाहीत!

 

नितीनराजे आणि स्वातीताई, खाड्यांचे सुधाकर, जतच्या कोळेकरांचे भाऊसाहेब आणि त्यांच्यासोबतचे दोघे-तिघे ‘रेल्वे इंजिन’ छाप ‘केपा’ दगडावर उडवत बसले होते. पण ओल्या झाल्यामुळं एक ‘केप’ उडेल तर शपथ! शेवटी त्यांनी तोही नाद सोडून दिला.‘बकरा’ छाप फटाकेयंदा बाजारात ‘बकरा छाप’ फटाके नव्यानं आलेत. मोठा आवाज न होता केवळ ‘फुस्सऽऽ’ असा आवाज त्यातनं येतो म्हणे! सांगलीचे सुरेशअण्णा, शेंडग्यांचे प्रकाशअण्णा, त्यांचे बंधू सुरेश, होनमोरे, सुरेखाताई यांच्याकडं त्या माळा असल्याचं समजलं. आटपाडीचे अमरबापू आणि गोपीचंद, मिरजेचे जाधव मास्तर, जितेंदर, शिराळ्याचे सत्तूभाऊ यांनीही ‘बकरा छाप’ फटाक्यांची आॅर्डर दिल्याचं आता समोर येऊ लागलंय.(‘सरकारनामा’मधील सर्व पात्रं खरी आहेत, कुणाला ती काल्पनिक वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा.)