शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

तंत्रज्ञानाच्या बळावर विकासाचा राजमार्ग

By admin | Updated: June 30, 2014 00:48 IST

सध्या ‘लॅब’ मध्ये बंदिस्त असलेले विज्ञान-तंत्रज्ञान तळागळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच विकासाचा राजमार्ग प्रशस्त होऊ शकतो,

विज्ञान भारतीच्या अधिवेशनाचा समारोप : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर : सध्या ‘लॅब’ मध्ये बंदिस्त असलेले विज्ञान-तंत्रज्ञान तळागळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच विकासाचा राजमार्ग प्रशस्त होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, जलवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विज्ञान भारतीच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी आयटी पार्कमधील कवि कुलगुरू कालिदास सभागृहात समारोप पार पडला. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर होते. अतिथी म्हणून विज्ञान भारतीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विजय भटकर, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, मनमोहन वैद्य, डॉ. व्ही. के. सारस्वत, के. ई. बासू, विज्ञान भारतीचे सहसचिव जयकुमार व जयंत सहस्रबुद्धे उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, देशातील वैज्ञानिक चांगले काम करीत आहे. परंतु त्यांच्यात आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी हा दुरावा दूर करावा लागेल. याशिवाय केंद्रीयस्तरावर एक ‘थिंक टॅँक’ तयार केली जाणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या या समितीमध्ये विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश राहणार आहे. गंगा नदीच्या शुद्धीकरणाविषयी बोलताना, ते म्हणाले, या नदीत सोडण्यात येणाऱ्या खराब पाण्याचा कसा उपयोग करता येईल, यावर विचार केला जात आहे. तसेच देशातील आयात व निर्यात शुल्कात सध्या सुमारे ३०० बिलियन डॉलर्सची तफावत आहे. ती कमी करण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार करून इथेनॉलचा वापर वाढविण्याची गरज आहे. मात्र हे सर्व करताना पर्यावरणाचा समतोल राखावा लागेल. यासाठी रस्त्यावरील मोठ्या झाडांची कटाई न करता, त्यांचे प्रत्यारोपण व नरेगातर्गंत नवीन वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अनिल काकोडकर यांनी विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना समग्र व एकात्मिक दृष्टिकोनातून विज्ञानाची चर्चा व्हावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)