शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन - उद्धव ठाकरे

By admin | Published: April 16, 2016 8:04 AM

हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता उसळून बोलत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता उसळून बोलत नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे. या देशात हिंदू असणे हा अपराधच झाला आहे व हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. सत्तेने माणूस आंधळा होतो, पण इथे तर सत्तेमुळे डोळ्यांच्या साफ खाचा होऊन बुबुळेच बाहेर पडली आहेत, असे टीकास्त्र त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सोडले आहे. तसेच हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणीही ठोकणार नाही, हिंदूना एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल, असेही उदअधव यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा ‘इसिस’ने पुन्हा केली आहे. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे व हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही. हिंदूंना मारण्याची भाषा जेव्हा केली जाते तेव्हा येथील हिंदुत्ववादी राज्यकर्ते कानात बोळे व तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन बसतात. मात्र अशीच धमकी जर मुसलमान व अन्य धर्मीयांच्या बाबतीत दिली असती तर एव्हाना सरकारातील बडे लोक छातीची ढाल करून त्यांच्या रक्षणासाठी उभे राहिले असते, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये सत्तेसाठी पीडीपीशी युती करणा-या भाजपा सरकारवर उद्धव यांनी टीकास्त्र सोडले आहे. ' जे लोक कालपर्यंत हिंदू पंडितांची चिंता वाहण्याचे राजकारण करीत होते ते आज स्वत: कश्मीरात सत्तेत आहेत व ज्यांनी हिंदूंना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा लोकांबरोबर सत्तेची हातमिळवणी झाली आहे,' अशी टीका उद्धव यांनी केली आहे.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- कोणीही उठतो आणि हिंदुस्थानच्या कानफटात मारतो असे नेहमीच घडताना दिसत आहे. हिंदुस्थानातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा ‘इसिस’ने पुन्हा केली आहे. हिंदू लोकांसह इस्लाम न मानणार्‍या लोकांचा खात्मा करू, संपूर्ण हिंदुस्थानात शरीयत कायदा लागू करू असे या मंडळींनी सीरियात बसून जाहीर केले आहे. हिंदूंना खतम करण्याची भाषा यापूर्वी अल कायदा, तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी अनेकदा केली आहे. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे व हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही. राममंदिरप्रश्‍नी भाजपने अलगद आपल्या काखा वर केल्या आहेत. येथील स्वत:स हिंदुत्ववादी मानणारे पुढारी अधूनमधून गर्जना करीत असतात, पण इसिससारख्या संघटनांशी मुकाबला करण्याच्या बाबतीत सगळ्यांच्याच मिश्या खाली पडत असतात. 
- नागपुरात कन्हैयाकुमारच्या गाडीवर दोन दगड मारल्याने हिंदुत्व मजबूत होण्याऐवजी कन्हैयासारख्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व ते हिंदुत्वासाठी बरे नाही. हिंदूंना मारण्याची भाषा जेव्हा केली जाते तेव्हा येथील हिंदुत्ववादी राज्यकर्ते कानात बोळे व तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन बसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘इसिस’ किंवा अन्य दहशतवादी संघटनांनी अशा प्रकारची धमकी येथील मुसलमानांच्या बाबतीत वा अन्य धर्मीयांच्या बाबतीत दिली असती तर एव्हाना सरकारातील बडे लोक छातीची ढाल करून त्यांच्या रक्षणासाठी उभे राहिले असते. मुसलमानांच्या वा ख्रिश्‍चनांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा गर्जना सरकारी पातळीवर झाल्या असत्या व अल्पसंख्याक म्हणून या लोकांच्या सुरक्षेसाठी चिंतामय उसासे टाकण्याची राष्ट्रीय स्पर्धाच लागली असती. 
- कश्मीरातील हिंदू पंडितांचे जे शिरकाण गेली पंचवीसेक वर्षे सुरू आहे तो तरी काय प्रकार आहे? तिथेही पद्धतशीरपणे हिंदूंचा खात्माच झाला आहे व जे हिंदू पंडित वाचले आहेत ते आपल्याच देशात निर्वासिताचे जिणे जगत आहेत. जे लोक कालपर्यंत हिंदू पंडितांची चिंता वाहण्याचे राजकारण करीत होते ते आज स्वत: कश्मीरात सत्तेत आहेत व ज्यांनी हिंदूंना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा लोकांबरोबर सत्तेची हातमिळवणी झाली आहे, पण तिथे आजही हिंदूंना प्रवेश नाही व हिंदूंनी पुन्हा परत यावे यासाठी विशेष प्रयत्न नाहीत. 
- या देशात हिंदू असणे हा जणू अपराधच झाला आहे व हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. सत्तेने माणूस आंधळा होतो, पण इथे तर सत्तेमुळे डोळ्यांच्या साफ खाचा होऊन बुबुळेच बाहेर पडली आहेत. म्हणूनच स्वराज्यातील हिंदूंची दुर्दशा व असुरक्षित जगणे राज्यकर्त्यांना दिसत नाही. हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या हल्ल्याचा बदला घेऊ असे एक विधान संरक्षण मंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही तशी हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल!