शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

हिवरेबाजारचे शेतकरी सुटीवर!

By admin | Published: March 30, 2016 12:45 AM

पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिके घेणे बंद करण्याचा निर्णय हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. बारा वर्षांनंतर येथील शेतकऱ्यांनी अशी सुटी घेतली आहे.

- सुधीर लंके,  अहमदनगरपिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिके घेणे बंद करण्याचा निर्णय हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. बारा वर्षांनंतर येथील शेतकऱ्यांनी अशी सुटी घेतली आहे.हिवरेबाजारने जलसंधारण केल्यामुळे या गावाला १५ वर्षांत टॅँकरचे दर्शन घडलेले नाही. उन्हाळ्यातही गाव विहिरीतील पाण्यावर पिके घेते. यावर्षी मात्र टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गतवर्षी गावात केवळ ३०९ मिमी पाऊस पडला. अशाही परिस्थितीत गावाने खरीप हंगाम शंभर, तर रब्बी हंगाम ६० टक्के घेतला आहे. गावातील ३४८ विहिरींपैकी नव्वद टक्के विहिरींना आजही पाणी आहे. मात्र, हे पाणी उपसले, तर उन्हाळ्यात टंचाई भासू शकते. त्यामुळे गावाने आता पावसाळ्यापर्यंत नवीन पीक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय यापूर्वी २००३ मध्ये घ्यावा लागला होता. या निर्णयामुळे त्या वेळी टॅँकर टळला होता. भोयरेपठार, भोयरे खुर्द, निवडंगेवाडी ही गावेही पिके घेणे बंद करण्याचा विचार करत आहेत.विहिरीत ३० फुटांपर्यंत पाणी आहे. दररोज अडीच रुपयांत प्रत्येक घराला ५०० लीटर पाणी नळाद्वारे दिले जात आहे. यात खंड पडणार नाही, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.प्रत्येक गावाने संघटितपणे पाण्याचे व्यवस्थापन केले, तर आपण टॅँकरला फाटा देऊ शकतो. प्रत्येक गावात तीन-चार विहिरींना तरी पाणी असते. या विहिरींचे पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी न उपसण्याचा निर्णय झाला तरी अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. - पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, राज्य आदर्श गाव समिती