शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

'मिसेस होम मिनिस्टर' यांचा फोन कॉल देतोय महाराष्ट्र पोलिसांच्या कुटुंबियांना मोलाचा 'आधार' 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 2:03 PM

''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही.

ठळक मुद्देड्युटीवर असणाऱ्या राज्यातल्या 87 पोलिसांना आजवर कोरोनाने नेले काळाच्या पडद्याआड गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कोरोना काळात राज्यात 28 जिल्ह्यात केला दौरा

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसदलाचा कुटूंबप्रमुख या नात्याने जास्तीत जास्त पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क ठेवण्याचे धोरण स्विकारले आहे. गृहमंत्र्यांच्या 'होम मिनिस्टर' असणाऱ्या त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी देखील याच पद्धतीने संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्या बोलतात ते पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पत्नींशी...होय, दररोज राज्यातल्या किमान वीस पोलिस पत्नींशी त्या संवाद साधतात.

''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही. गृहमंत्र्यांंच्याच पत्नी बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र पोलिस पत्नींच्या भावना अनावर होतात. आपुलकीने आणि वडीलधाऱ्याच्या मायेने आरती देशमुख बोलू लागतात तेव्हा संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्याची पत्नी भारावून जाते आणि फोन संपेपर्यंत आत्मविश्वासाने भरून जाते.    

कोरोनाच्या संकटाने ड्युटीवर असणाऱ्या राज्यातल्या 87 पोलिसांना आजवर कोरोनाने काळाच्या पडद्याआड नेले आहे. शेकडो पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे ड्युटीवर जाणाऱ्या घरातल्या कर्त्या माणसाबद्दल घरच्यांना काळजी लागून राहते. आरती देशमुख यांनी 'लोकमत'ला सांगितले, ''गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कोरोना काळात राज्यात 28 जिल्ह्यात दौरा केला. शेकडो लोकांना ते भेटतात. रुग्णालयांमध्ये जातात. अशावेळी पत्नी म्हणून माझ्या मनातही सतत काळजी असते. त्यामुळेच ज्यांच्या घरातील माणूस ड्युटीवर आहे त्यांच्या मनात काय भावना येत असतील याची कल्पना मी करु शकते. यातूनच मला वाटलं की आपण पोलिसांच्या घरातल्या महिलांशी बोललं पाहिजे. त्यांना धीर दिला पाहिजे. याच भावनेतून मी रोज जास्तीत जास्त पोलिसांच्या घरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते.'' 

 माझा फोन गेल्यानंतर बहुतेक जणींच्या भावना अनावर होतात. त्यांना रडू कोसळते. ड्युटीवर असणाऱ्याबद्दलची काळजी त्या व्यक्त करतात. ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांना मुलाबाळांना देखील नीट जवळ घेता येत नाही. ड्युटीवर असताना कुठून संसर्ग होईल याची धास्ती त्यांना असते. आपल्यामुळे माझ्या घरच्यांना कोरोनाची लागण होऊ नये याचीही काळजी त्यांच्या मनात असते. कोरोनानं जीवनच बदलून गेल्याचे त्या सांगतात, असा अनुभव आरती देशमुख यांनी सांगितला. त्यावर मी त्यांना दिलासा देते. तुम्ही एकट्या नाहीत. सरकार, समाज तुमच्या पाठीशी आहे, हे सांगते. यातून त्यांची उमेद वाढते असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस