शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

फळबागांसाठी सामूहिक शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2015 1:48 AM

फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे देण्यात येणार

- विवेक चांदूरकर, वाशिम

फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे देण्यात येणार आहे. याकरिता फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना सामुहिक अर्ज कृषी विभागाकडे करावा लागणार असून, फळबागांच्या क्षेत्रफळानुसार शेततळे मंजूर करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे फळबागा कमी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात धरणांसह विहिरी, तलाव व शेततळ्यांवर आधारीत सिंचन करण्यात येत असल्याने द्राक्ष, डाळींब, मोसंबीच्या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत.त्यातुलनेत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू आणि खारपाणपट्टा असल्यामुळे सिंचन करण्यात येत नाही. त्यामुळे फळबाग नाहीत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी काही प्रमाणात असलेल्या संत्रा व केळीच्या फळबागही आता कमी होत आहे. त्यामुळे यामध्ये वाढ करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध नाविण्यपूर्ण योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना समुहिक शेततळे देण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी फळबाग असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांना एक गट स्थापन करावा लागणार आहे. या शेतकऱ्यांना चार शेतांच्या मध्यभागी शेततळे देण्यात येईल. हे शेततळे १०० टक्के अनुदानावर असून, शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार नाही. शेततळ्याचा आकार हा फळबागांच्या क्षेत्रफळावर अवलंबून राहणार आहे. पावसाळा व हिवाळ्यात विहिरी किंवा धरणांमध्ये जलसाठा असल्यामुळे सिंचन करता येते. मात्र उन्हाळ्यात साठा संपल्यावर पाणी नसल्याने फळबागा सुकतात. उन्हाळ्यात शेततळ्यातील पाणी फळबागांना दिल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होवू शकतो. त्यादृष्टीनेच शासनाने प्लॅस्टीकची पन्नी असलेले शेततळे १०० टक्के अनुदानावर देण्याची योजना सुरू केली आहे.सामूहिक फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्लॅस्टिकची पन्नी असलेले शेततळे देण्यात येणार आहे. १० लाख ते १ कोटी लिटर पाणी धारण क्षमता असलेले शेततळे या योेजनेंतर्गत देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे असलेल्या फळबागांना किती पाण्याची गरज आहे, याचा अंदाज घेऊन शेततळ्याचा आकार ठरविण्यात येणार आहे. विदर्भातही फळबाग वाढावी याकरिता शासनाच्यावतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे देण्यात येणार आहे. हे शेततळे १०० टक्के अनुदानावर आहे. फळबाग असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांनी अर्ज केला तर कृषी विभागाकडून शेततळे देण्यात येणार आहे. - मुरली इंगळे प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, वाशिम