शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

घरे महागणार!

By admin | Published: April 02, 2017 12:47 AM

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढविलेले रेडीरेकनरचे दर शनिवारपासून लागू झाल्याने राज्यातील घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढविलेले रेडीरेकनरचे दर शनिवारपासून लागू झाल्याने राज्यातील घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. रेडीरेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक ९.८२ टक्क्यांची वाढ अहमदरनगरमध्ये तर सर्वात कमी १.५० टक्के वाढ नागपूरमध्ये करण्यात आली आहे. पुणे महापालिका क्षेत्रासाठी ३.६४ तर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी ४.४६ टक्के वाढ करण्यात आली असून पुणे ग्रामीण क्षेत्रात १५.३ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी वाढ ८.६० टक्के आहे. त्यामुळे शहरालगतच्या तसेच ग्रामीण भागातील मोक्याच्या जागांच्या किमती वाढणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी रेडीरेकनरच्या दरात सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सध्या जमीन खरेदी विक्रीच्या आणि बांधकाम क्षेत्रात असलेली मंदीसोबतच नोटाबंदीचा बसलेला फटका याचा अभ्यास करुन ५.८६ टक्क्यांची वाढ सुचविण्यात आली. राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील ४१ हजार ६७८ गावांमध्ये ७.१३ टक्के, तर प्रभाव क्षेत्रातील १ हजार ७८८ गावांमध्ये ६.१२ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर २७ महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी ४.७४ टक्क्यांची वाढ झाली असल्याने शहरी व निमशहरी भागात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वाढणार आहेत. महापालिका क्षेत्रांचे चित्र पाहता सर्वाधिक वाढ अहमदनगरमध्ये तर त्या खालोखाल जळगाव (९.४५), नाशिक (९.३५) टक्के अशी वाढ झालेली आहे. नाशिकचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाल्याने शेती झोनमधील जमिनी निवासी झोनमध्ये आल्या आहेत. त्यामुळे ही वाढ दिसून येत असल्याचे नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामस्वामी यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये झालेल्या कृत्रिम दरवाढीमुळे दर फुगवटा तयार झाला आहे. हा फुगवटा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. नवी मुंबई (१.६७), बृहन्मुंबई (३.९५), ठाणे (३.१८), मिरा भाइंदर (२.६६), कल्याण डोंबिवली (२.५६) उल्हासनगर (२.८८), भिवंडी निजामपूर (१.७१), वसई-विरार (२.०३), पनवेल (३.१७) अशी वाढ करण्यात आली आहे. मुंबई विभागाची एकूण वाढ ३.९५ टक्के झाली असून मागील वर्षी ही वाढ सात टक्के होती. पुणे विभागातील कोल्हापूर (३), सोलापूर (६.३०), सांगली-मिरज-कुपवाड (४.७०) अशी वाढ करण्यात आली असून पुणे विभागात एकूण ८.५० टक्के वाढ झाली होती. गेल्या वर्षी ही वाढ ११ टक्के होती. विभागनिहाय सर्वाधिक वाढ नाशिकमध्ये (९.२०) झाली असून द्वितीय क्रमांकावर पुणे (८.५०) आहे. त्यानंतर अमरावती (६.३०), औरंगाबाद (६.२०), कोकण (४.६९), मुंबई (३.९५) अशी वाढ आहे. तर सर्वात कमी नागपूरमध्ये २.२० टक्के वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)