शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

येऊ कशी कशी मी नांदायला हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 3:18 AM

महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याने या टंचाईग्रस्त गावात मुली देण्यास चक्क नकार दिला जात आहे.

संजय कांबळे,बिर्लागेट- भातसा, बारवी, उल्हास, काळू अशा बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या परिसरातील रायते, सांगोडा, पिंपळोली आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याने या टंचाईग्रस्त गावात मुली देण्यास चक्क नकार दिला जात आहे.आतापर्यंत मुलाची नोकरी, घर, जमीनजुमला याकरिता बहुसंख्य वधूपक्षाचा आग्रह असायचा, मात्र आता घरात पाण्याची सोय असेल तरच पुढची बोलणी करू, असा पावित्रा मुलींच्या पालकांनी घेतल्याने कल्याण ग्रामीण भागातील वाड्या पाड्यातील गावातील मुलांची लग्ने होतात की नाही, या कल्पनेने त्यांच्या पालकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तुळशी विवाहानंतर सर्वत्र लगीनघाई सुरु होते. मुली पाहणे, देणे-घेणे बस भाडे, मानपान, मंडप, बॅण्डबाजा, बँजो, डिजे याचे बुकिंग सुरू होते. पत्रिका छापणे, त्या वेळीच वाटणे याची लगबग गावागावात दिसते. काही मुलींचे पालक लग्नाचा भरमसाठ खर्च करुन अक्षरश: कर्जबाजारी होतात. मात्र इतका खर्च करूनही लग्नानंतर आपल्या मुलीला आयुष्यभर डोक्यावरून पाण्याचे हंडे-कळशा वाहाव्या लागणार असतील तर अशा टंचाईग्रस्त गावांत त्यांची लग्ने करायची कशाला, असा त्यांच्या पालकांचा सवाल आहे. कल्याण ग्रामीण भागातील ४१ ग्रामपंचायतीमधील ६६ गावांमधील वाड्यापाड्यातील लोकांकरिता एक हजार ८५ जलस्रोत असून यामध्ये हातपंप, सार्वजनिक विहिरी, नळपाणी पुरवठा योजना यांचा समावेश आहे. बहुतेक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनी पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे या कालबाह्य सोईसुविधा असून नसल्यासारख्या आहेत. भातसा, बारवी, काळू व उल्हास अशा चार बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या परिसरातील या गावांमध्ये उन्हाळ््यात महिलांना डोक्यावरुन हंडे-कळशा वाहव्या लागतात. रात्री-अपरात्री पाणी आणायला जावे लागते. सांगोडा गावांतील महिला पाणी आणण्यास गेली असता सर्पदंश होऊन गेली तर पिंपळोली गावातील कमलाबाई राहणे यांचा विंचू दंशाने जीव गेला. डोक्यावरून पाणी वाहण्यात आयुष्य गेल्याने महिलांच्या डोक्याचे केस गेल्याचे सरपंच सुनीता गायकर म्हणाल्या. मुलगा गरीब असला तरी चालेल, परंतु गावात, घरात पाण्याची सोय पाहिजे, असे विवाहेच्छुक मुलीचे पालक गणपत हिंदोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. >मुलीच्या सुखासाठीच घरच्यांचा विचारपाणी टंचाई, पीक, जनावरे याची वाताहत, यामुळे अशा गावात मुलगी द्यायला, नापसंती असल्याचे अ‍ॅड. सुनील गायकर यांनी सांगितले तर मुलीच्या सुखासाठी तिच्या घरच्यांनी असा विचार केला तर बिघडले कुठे? असा प्रश्न उशीद गावचे सुरेश गायकवाड यांनी विचारला. कल्याणच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई नाही असा विपरीत दावा कल्याण पाणीपुरवठा विभागाने केला कशाला, असा त्यांच्या पालकांचा सवाल आहे.